पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात शहिदांना मानवंदना दिल्या जात होती. भारतीय क्रिकेट संघाने शहिदांना मानवंदना दिली. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने सैन्याची कॅप घालून शहिदांना मानवंदना दिली होती. या मानवंदनेचा पाकिस्तानकडून विरोध केला जात आहे. भारताने खेळामध्ये राजकारण आणू नये असे वक्तव्य करत भारतावर कारवाईची मागणी पाकिस्तानकडून केली जात आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी) कडे ही मागणी केली आहे. शहिदांना मानवंदना देण्यासाठी कॅप घालण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहे.
“It’s just not Cricket”, I hope ICC ll take action for politicising Gentleman’s game … if Indian Cricket team ll not be stopped, Pak Cricket team should wear black bands to remind The World about Indian atrocities in Kashmir… I urge #PCB to lodge formal protest pic.twitter.com/GoCHM9aQqm
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) March 8, 2019
“क्रिकेट हा मान्यवर (जंटलमन) लोकांचा खेळ आहे त्यामध्ये राजकारण करण्याचे काम भारताने केले आहे. पाकिस्तानवर भारताने हल्ला केला होता. मात्र पाकिस्तानी संघाने काळी फीत लावून क्रिकेट सामना खेळला नाही.” असे ट्विट पाकिस्तानी मंत्र्यांनी केले आहे.