केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारानंतर आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या जागी मनसुख मांडवीया यांना देशाचे नवीन आरोग्यमंत्री करण्यात आले आहे. दरम्यान, देशभरात कोरोना लसीचा तुटवडा असल्याचा आरोप करणारे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी नव्या फेरबदल आणि मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळल्याबद्दल निशाणा साधला आहे. मनसुख मांडवीया यांना देशाचे नवे आरोग्यमंत्री केल्यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एक ट्विट केले आहे. राहुल गांधींनी या ट्विटमध्ये अले लिहिले, “याचा अर्थ असा आहे की यापुढे लसांची कमतरता भासणार नाही का?” या ट्विटमध्ये राहुल गांधींनी हॅशटॅग चेंजचा वापर देखील केला आहे.
Does this mean no more vaccine shortage?#Change
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 8, 2021
कित्येक महिने राहुल गांधी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर जोरदार टीका करीत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील कोरोना लसीचा आभाव संपवण्यासाठी अनेकवेळा विनंती केली आहे. मात्र, भाजप सरकारने काँग्ररेसचा हा दावा खोटा असल्याचे सांगून फेटाळून लावला.
यापूर्वी राहुल गांधींनी बऱ्याचदा केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाविरूद्ध जोरदार हल्लाबोल केला होता. गेल्या आठवड्यात कोरोना लस नसल्याबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यावेळी देखील त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. ज्यामध्ये असे म्हटले की, जुलै आला आहे, मात्र कोरोना लस आली नाही. यापूर्वी राहुल गांधी यांनीही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या भरपाईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लक्ष्य केले होते. यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी त्यांना कठोर उत्तर दिले. या टीकेवर केंद्राने हे स्पष्ट केले आहे की, जुलैमध्ये साधारण १२ कोटी डोस विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील. यासह, लसीकरण मोहीम आणखी वेगाने करण्यात येणार आहे.