तामिळनाडू होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच सुपरस्टार रजनीकांतने मोठी घोषणा केली आहे. रजनीकांतने प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष स्थापन करणार नसल्याचे जाहीर केलं आहे. रजनीकांत ३१ डिसेंबरला राजकीय पक्ष स्थापन करणार होते. मात्र, रजनीकांतच्या या निर्णयाने त्यांच्या चाहते निराश झाले आहेत. रजनीकांत यांनी तीन पानांचं पत्र ट्विट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल त्यांनी माफीदेखील मागितली आहे.
बिघडलेली प्रकृती देवाने दिलेला इशारा म्हणत रजनीकांतने राजकारणातून माघार घेतली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या प्रकृतीसंदर्भात जे काही घडलं त्याला मी देवाचा इशारा समजतो आणि २०२१ तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे, असं त्यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. रजनीकांत यांनी यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झालो असं वाटू नये यासाठी मी पक्ष स्थापन का करत नाही याचा कारण आधिच सांगितलं.
— Rajinikanth (@rajinikanth) December 29, 2020
रजनीकांतने ३१ डिसेंबरला नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका लढणार हे नक्की झालं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी रजनीकांत हैदराबाद येथे चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.