जम्मू-काशमीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरुन जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या परिसराला रिकामे करण्यात आले असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
#UPDATE J&K Police: Incriminating material including arms and ammunition was recovered from the site of encounter in Bagender Mohalla of Bijbehara, Anantnag, where two terrorists were killed. Police has registered a case. https://t.co/2aCCdj9zNY
— ANI (@ANI) April 25, 2019
अशी झाली चकमक
अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहारा येथील बागेंदर मोहल्ला परिसरामध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जवळपास एक तास चकमक सुरु होती. आता जवानांकडून सर्च ऑपरेश करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावर तपासणी केली असता मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jammu & Kashmir: Visuals from Bagender Mohalla of Bijbehara in Anantnag where two terrorists were neutralized in an encounter with security forces. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/G9JYNFoGXh
— ANI (@ANI) April 25, 2019
१४ फेब्रुवारी ते आतापर्यंत ४१ दहशतवादी ठार
बुधवारी श्रीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जीओसी केजीएस ढिल्लन यांनी सांगितले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी काश्मीरमध्ये मोठ्या कारवाईला सुरुवात केली. १४ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत जवानांनी ४१ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या २५ दहशतवाद्यांचा समावेश आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये १३ पाकिस्तानी दहशतवादी आहेत. त्याव्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.