घरदेश-विदेशभारतीय लष्कराचा पाकवर स्ट्राईक

भारतीय लष्कराचा पाकवर स्ट्राईक

Subscribe

5 रेंजर्सना कंठस्नान, 12 बंकर्स उद्ध्वस्त

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्यावर मोठा स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानच्या 5 जवानांना ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले असून, पाकचे अनेक बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतरची भारतीय लष्कराने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे याला गेल्या काही दिवसांतील मोठा स्ट्राईक असेही म्हटले जात आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत होते. पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी रेंजर्सच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकच्या या कारवायांना भारतीय लष्कराने चांगलेच प्रत्युत्तर दिले. पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पाच रेंजर्सना कंठस्नान घातले. यासोबतच पाकचे 12 बंकर्सही उद्ध्वस्त केले आहेत. याबाबत लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी माहिती दिली, तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास इंडियन आर्मी नेहमीच तयार आहे, असेही सिंग यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -