घरदेश-विदेशआंदोलनाचा ‘हाँगकाँग पॅटर्न’

आंदोलनाचा ‘हाँगकाँग पॅटर्न’

Subscribe

इंटरनेट बंदीमुळे ऑफलाईन मेसेंजिंग अ‍ॅपचा वापर

देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्यावरून वातावरण तापलेले आहे.ठिकठिकाणी हिंसक आंदोलने होताना दिसत आहेत. बहुतांश प्रचार हा इंटरनेटच्या माध्यमातून होताना दिसत आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, भारतातील आंदोलकांनी चीनविरोधात रस्त्यावर उतरलेल्या हाँगकाँगमधील आंदोलकांचा मार्ग अवलंबल्याचे दिसत आहे.

भारतातील आंदोलकांनीही इंटरनेट बंदीवर तोडगा काढला असून इंटरनेटशिवाय चालणार्‍या ब्रिजफाय, फायर चॅट यांसारख्या अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. चिनी सरकार आपण काय चॅटिंग करतोय यावर पाळत ठेवत असल्याचे लक्षात आल्यानंतर हाँगकाँगमधील आंदोलकांनी ऑफलाइन मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर केला होता.

- Advertisement -

डाऊनलोड वाढले
अ‍ॅपद्वारे कमी अंतरावरील ब्लूटुथ कनेक्शनच्या आधारे संदेश पाठवता येतात. अमेरिकी अ‍ॅप इंटेलिजेंस फर्म ऐपोटॉपियाच्या आकडेवारीनुसार, १२ डिसेंबर म्हणजे आसाम आणि मेघालयमध्ये इंटरनेटवर बंदी घातल्यानंतर ब्रिजफाय अ‍ॅप डाऊनलोड आणि त्याचा वापर करण्यामध्ये जवळपास ८० टक्के वाढ झाली आहे. इंटरनेटवर बंदी घालण्याआधी देशात दररोज सरासरी केवळ २५ जण ब्रिजफाय अ‍ॅप डाऊनलोड करायचे, तर १३ डिसेंबरनंतर यात १०० टक्क्यांनी वाढ झाली आणि आकडा दर दिवशी जवळपास २६०९ डाऊनलोड पार गेला आहे.

ब्रिजफाय अ‍ॅपचे सक्रिय युजर्सही तब्बल ६५ पटीने वाढले असून ११ डिसेंबरच्या आधी ब्रिजफाय अ‍ॅप केवळ १८४ जण वापरायचे. तर, १२ डिसेंबरपासून हा आकडा वाढून १२,११८ वर पोहोचला आहे. दिल्लीच्या काही भागांमध्ये इंटरनेटवर बंदी घातल्यानंतर एकट्या दिल्लीत या अ‍ॅपच्या डाऊनलोड आणि वापराचे प्रमाण ३० पटीने वाढल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -