घरदेश-विदेशLok Sabha 2024 : हा तर नकली हिंदुत्वाचा पराभव; ठाकरे गटाचा भाजपाला...

Lok Sabha 2024 : हा तर नकली हिंदुत्वाचा पराभव; ठाकरे गटाचा भाजपाला टोला

Subscribe

Thackeray Group : उद्धव ठाकरे यांच्या प्रचार गीतातील भवानी आणि हिंदू धर्म हे दोन शब्द काढण्याची नोटीस निवडणूक आयोगाकडून आल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले. त्यानंतर उद्धव गटाने भाजपा आणि निवडणूक आयोगावर 'सामना'मधून निशाणा साधला आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच प्रचारासाठी तयार केलेले मशाल गीत प्रसिद्ध केले. त्यांच्या या मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे दोन शब्द काढून टाकावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून प्रचार गीतातील दोन शब्द काढण्याची नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले. त्यानंतर उद्धव गटाने भाजपावर ‘सामना’मधून निशाणा साधला आहे. (Lok Sabha Election 2024 uddhav thackeray group slams election commission and bjp over hindu and bhavani word in song)

भवानी मातेशी वैर म्हणजे…

भवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. भवानीस कौल लावल्याशिवाय महाराष्ट्र कोणताही निर्णय घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीस भवानी तलवार म्हणतात. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी मातेने दिली, असे इतिहासातील कथेत स्पष्ट आहे. दुसरे असे की, तुळजाभवानीचे स्थान हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे. भवानी मातेशी वैर करणे म्हणजे स्वतःच्या गवऱ्या स्मशानात वेचून येण्यासारखे आहे. मोदी यांच्या निवडणूक आयोगाने भवानी मातेशी राजकीय पंगा घेतला आणि भवानी मातेवरच बंदी घातली. याचा फटका मोदी-शहांना बसल्याशिवाय राहणार नाही. कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती हिच्याबद्दल पुंकर नामक राक्षसाला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती धावून आली. तिने त्या राक्षसाचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती ‘त्वरिता’ किंवा मराठीत ‘तुळजा’ असे या हिंदू संस्कृतीत तसेच धर्मात आई तुळजाभवानीचे महत्त्व मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. महाराजांनी कुलस्वामिनी तुळजाभवानीची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली.

- Advertisement -

नवीन चिन्ह मिळाल्याने नवीन गीत

महाराष्ट्राची चार दैवते आहेत. त्यात महालक्ष्मी, खंडोबा, भवानी आणि विठोबा आहेत. अशा भवानी मातेचा जागर महाराष्ट्रात रोज होतो, पण महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीस ‘अटकाव’ करण्याचे पाप भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगाने केले. शिवसेनेचे परंपरागत धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने मिंधे गटास दिले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस मशाल चिन्ह मिळाले. त्या मशालीच्या प्रचारासाठी एक गीत रचले, संगीतबद्ध केल्याचे उद्धव गटाने अग्रलेखात सांगितले आहे. तसेच या ‘मशाल गीता’मुळे भाजप आणि त्यांच्या मिंध्यांची बोलती बंद झाली, पण निवडणूक आयोगाला पुढे करून त्यांनी ‘जय भवानी’ तसेच ‘हिंदू हा तुझा धर्म’ या ओळींवर आक्षेप घेतला. त्यामुळे धार्मिक प्रचार होतो, असे भाजपचा निर्वाचन आयोग म्हणतो. खरे तर या गीतात फक्त भवानी मातेचा उद्घोष केला आहे. शिवसेनेस मते द्या, असे सांगितले नाही. त्यामुळे आचारसंहिता आडवी आली कोठे?” असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे. (Lok Sabha Election 2024 uddhav thackeray group slams election commission and bjp over hindu and bhavani word in song)

हा महाराष्ट्र धर्म आणि अस्मितेचा प्रश्न

अमित शहा रामलल्लाच्या मंदिरावर मते मागतात. भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिराचा उल्लेख वारंवार आहे. भाजपला मते द्या, रामलल्लाचे फुकट दर्शन घडवू, असे जाहीर सभांतून भाजप नेत्यांकडून सांगितले जाते. यावर निवडणूक आयोगाचा आक्षेप नाही. आता निवडणूक आयोगाचा ‘हिंदू’ या शब्दावरही आक्षेप आहे. पंतप्रधान मोदी वारंवार ‘हिंदू हिंदू’ करीत अंगास भस्म, राख लावून प्रचार करीत आहेत हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का? भवानी मातेचे नाव शिवसेनेच्या ‘मशाल गीता’तून काढणे हा छत्रपती शिवरायांचा, महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. त्यामुळे भवानी माता आणि तिचा उल्लेख ‘मशाल गीता’तून काढणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. उद्या हे लोक ‘शिवाजी’ शब्दावर आक्षेप घेतील. प्रश्न फक्त हिंदुत्वाचा नसून महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे,” असं उद्धव गटाने म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024 uddhav thackeray group slams election commission and bjp over hindu and bhavani word in song)

- Advertisement -

Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -