घरदेश-विदेशआणि राहुल गांधींनी दिली लग्न केल्याची कबुली!!

आणि राहुल गांधींनी दिली लग्न केल्याची कबुली!!

Subscribe

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि अभिनेता सलमान खान लग्न केव्हा करणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे? नाही का? पण राहुल गांधी आपले लग्न झाल्याची कबुली दिली आहे.

देशातील मोस्ट बॅचलर म्हणून अभिनेता सलमान खान आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांचे लग्न केव्हा होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अहो, पण काय आश्चर्य! राहुल गांधी यांनी लग्न केल्याची कबुली दिली आहे. मन मे लड्डू फुटा? अहो पण जरा थोडं थांबा. कारण राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाशी लग्न केल्याची कबुली दिली आहे. राहुल गांधी सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हैद्राबादमध्ये पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही लग्न केव्हा करणार? असा सवाल पत्रकारांनी केला. यावर माझे लग्न काँग्रेस पक्षाशी झाल्याचे उत्तर काँग्रेसचे बॅचलर अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. सध्या तरी माझ्यासमोर २०१९ सालच्या लोकसभा निवडणुका असून नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव हेच माझे लक्ष्य असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या मिठीबद्दल देखील विचारले गेले. त्यावर त्यांनी काँग्रेस तिरस्काराचे राजकारण करत नाही असे उत्तर दिले. गेल्यावर्षी देखील राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लग्न होईल तेव्हा होईल असे उत्तर दिले होते. त्यामुळे राहुल गांधी सध्या तरी ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ या मनस्थितीमध्ये असल्याचे दिसत आहे.

तेलंगणा दौरा

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून राहुल गांधी भाजपविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. संसदेमध्ये देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर चौफेर हल्ला चढवल्याचे आपण पाहिले. २०१९च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी काँग्रेसचे नेत्यांशी संवाद साधत पक्षाच्या स्थितीवर चर्चा केली. तसेच कार्यकर्त्यांशी देखील राहुल गांधी संवाद साधत आहेत. यावेळी राहुल गांधी पक्ष बांधणीवर विशेष लक्ष देताना पाहायला मिळत आहेत. दौऱ्यादरम्यान राहुल गांधी जेष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करत आहेत. आजी – माजी आमदार-खासदार आणि नेत्यांच्या भेटीगाठीवर देखील राहुल गांधी भर देत आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी वुमन हेल्प ग्रुपशी देखील संवाद साधला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन देखील या ग्रुपला दिले.

- Advertisement -

राहुल गांधी आक्रमक

राहुल गांधी सध्या आक्रमक झाले असून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. राफेल करारवरून देखील राहुल गांधी यांनी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील ही लढाई आपल्याला रस्त्यावर देखील पाहायाला मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -