बॉलीवूडच्या पिग्गी चॉप्सचा डंका नुसता बॉलीवूडमध्ये नाही तर हॉलीवूडमध्येदेखील आहे. नेहमीच वेगळ्या भूमिका निवडून त्याला पुरेपूर न्याय देण्यात प्रियांका चोप्रा १ नंबरवर आहे. पण सध्या ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. प्रियांका भूमिका साकारत असलेल्या ‘क्वाटिंको‘ या सिरीजमधील एका अॅपिसोडमध्ये दाखवण्यात आलेल्या सीनमुळे अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या असून प्रियांका! असं तू करायला नको होतं. अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत
काय होता तो सीन?
‘क्वाटिंको’ ही अमेरिकन मालिका अॅक्शनशी निगडीत आहे. या मालिकेचा ३ रा सीझन सुरु होता. त्यात प्रियांका एका एफबीआय एजंट अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारतेय. ‘क्वांटिको‘च्या लेटेस्ट अॅपिसोडमध्ये एक भारतीय नागरीक न्यू यॉर्कमध्ये बाँम्बस्फोटाचा कट रचतो असं दाखवण्यात आलं आहे. या सीनमध्ये दाखवलेल्या दहशतवाद्याच्या गळ्यात रुदाक्षाची माळ पाहून मुद्दाम हिंदूना अतिरेकी कारवाया करताना दाखवण्यात आलं आहे. हा सीन पाहून या मालिकेच्या भारतीय फॅन्सनी ताबडतोब प्रियांकाला ट्रोल केलं. एक भारतीय नागरीक असून तू दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या गोष्टीला कसा पाठिंबा देऊ शकते, असा नाराजीचा सूर तिच्या फॅन्समध्ये उमटला आणि त्यांनी ट्विट करत तिला ट्रोल केलं.
I work in Manhattan. Thousands of Indians work in Manhattan. Plotting a bomb blast in Manhattan is as good as plotting it in New Delhi.#Quantico writers mom dropped him/her on head or Pro-Pakistan/Islamic radical views have entered Hollywood.
And @priyankachopra how cud you?
— Abhishek Vaishampayan (@a_vaishampayan) June 5, 2018
What the hell was this episode of #Quantico .. they tried to show ‘Indian nationalists’ (their term) trying to blow up Manhattan to frame Pakistan.. I don’t even know what sort of ridiculous narrative was this episode trying to set.. nonsensical stuff..
— Aadit Kapadia (@ask0704) June 3, 2018
लेट्स वेट अॅण्ड वॉच
प्रियांका तिच्या सोशल मीडियावर नेहमी अपडेट असते. ती तिच्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट या ठिकाणी तिच्या फॅन्सना देते.‘क्वाटिंको’ च्या या भागामुळे तिच्यावर झालेल्या टीकेला तिने शांत राहत उत्तर दिलं आहे. ती म्हणाली आहे की, लेट्स वेट अॅण्ड वॉच!
क्वाटिंको’ ने केलं पॅकअप
क्वाटिंकोच्या सीरिजमधला ३ रा सीझन तसा रटाळ होता. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी चांगला नव्हताच. या नव्या सीझनची तुलना कायम पहिल्या आणि दुसऱ्या सीझनशी केली गेली. कारण या दोन सीझनमुळे प्रेक्षकांची अपेक्षा वाढली होती. पण या अपेक्षांवर तिसरी सीरिज खरी उतरली नाही. शिवाय ज्या भागामुळे प्रियांका ट्रोल झाली त्यानंतर त्या मालिकेने गाशा गुंडाळणंच पसंत केलं.