घरमनोरंजनबर्थडे बॉय पुष्कराज 'या'साठी म्हणाला सॉरी!

बर्थडे बॉय पुष्कराज ‘या’साठी म्हणाला सॉरी!

Subscribe

अभिनेता पुष्कराज चिरपुटकर याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपला मित्र सुव्रत जोशीला सॉरी म्हटले आहे. फेसबुकवर व्हिडिओ शेअर करून त्याने माफी मागितली आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रीय मालिकेतील कलाकारांची रिअल लाईफ मैत्रीही प्रेक्षकांपासून लपलेली नाही. या मालिकेतील आशुतोषची भूमिका साकारलेल्या पुष्कराज चिरपुटकर या कलाकाराने सुजय म्हणजेच सुव्रत जोशीची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे आज पुष्कराजचा वाढदिवस असून त्याने आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर करून सुव्रतला ‘सॉरी’ म्हटलं आहे. अखेर काय झालं असेल दोघांच्या मैत्रीत?, का म्हणाला पुष्कराज सुव्रतला सॉरी?, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, हो ना. तर जरा थांबा आणि पाहा हा व्हिडिओ.

काय म्हणाला ‘बर्थ डे’ बॉय पुष्कराज

“माझा खुप जवळचा मित्र जो खुप वर्षात मला भेटलेला नाईए सुव्रत जोशी. ज्याला मी सॉरी म्हणू इच्छितो. आम्ही जेव्हा भेटत होतो सेटवर… तेव्हा आम्ही खुप चहा प्यायचो आणि त्याला खुप टेम्ट व्हायच. त्याच्यामुळे त्याला चहा पिऊन हायपर अॅसिडिटी झाली. सो मी त्या सॉरी म्हणेन आणि एक सल्ला देईन. स्वभावाचा भाग आहे. पार्टी पिऊ नको. सॉरी. पार्टी करू शकतो आपण. पार्टी करूयात. तुला मी सॉरी म्हणतोय त्याचबरोबर मंजिरी, अक्षय टंकसाळे, स्तवन, रोहीत हळदणकर या सगळ्यांना थँकू. आपण सगळे मिळून पार्टी करूयात उद्यापासून कारण आज माझा हॅप्पी बर्थ डे आहे.”

- Advertisement -

‘पार्टी’ सिनेमासाठी खास संदेश

अभिनेता सुव्रत जोशी याचा पार्टी हा सिनेमा उद्या, ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शीत होत आहे. याला उद्देशून पुष्कराजने आपल्या व्हिडिओत पार्टीचा वारंवार उल्लेख केला आहे. शिवाय पार्टी करण्याकरता आज माझा बर्थ डे असल्याचे निमित्तही त्यांनी त्याच्या मित्रांना सुचवले आहे.

थ्री डी मधील दोस्ती यारी कायम

dil dosti duniyadari
दिल दोस्ती दुनियादारी टीम (सौजन्य-पुष्कराज फेसबुक)

संजय जाधव यांनी छोट्या पडद्यावर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका आणली आणि सर्वसामान्यांना मैत्रीचा अर्थ नव्याने समजला. या मालिकेतील पात्र त्यांना अगदीच जवळचे वाटू लागले. यातील रेशमा (सखी गोखले), मीनल (स्वानंदी टिकेकर), अॅना (पूजा ठोंबरे), कैवल्य (अमेय वाघ), सुजय (सुव्रत जोशी) आणि आशु (पुष्कराज चिरपुटकर) यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. लोकाग्रहा खातर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका त्याचा सीजन घेऊनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेपासून सुरू झालेली या सहा मित्रांमधील बाँडिंग आजही कायम आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -