सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर-आलियाच्या लग्नाची चर्चा होत आहे. तर कपूर कुटुंबात लग्नसराईची लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र या शुभ प्रसंगी रणबीरचे वडील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची कमतरताही कपूर कुटुंबाला जाणवत आहे. त्यानिमित्ताने रणबीर आणि ऋषी यांच्यातील मतभेदही चर्चेत आले आहेत. एकेकाळी रणबीर आणि ऋषी कपूर यांच्यातील मतभेद इतके टोकाला गेले होते की रागात रणबीरने राहते घर सोडले होते. तेव्हापासून तो एकटाच राहत आहे.
View this post on Instagram
रणबीरचं दीपिका पादुकोणबरोबर (Deepika Padukone) ब्रेकअप झाले. त्यानंतर तो कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) रिलेशनशिपमध्ये होता. यानंतर रणबीर आणि कतरिनाची ‘अजब प्रेम की गजब काहानी’ या चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. या जोडीला चांगली पसंतीही मिळाली होती. एकत्र काम करत असताना दोघांची मन जुळली आणि दोघे एकमेकांना डेट करत होते. ऋषी कपूर यांना रणबीर आलियाचे नाते अजिबात पसंत नसल्याचे माहिती अनेक रिपोर्टकडून समोर आली होती. तर रणबीरला कतरिनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये गमवायचे नव्हते. त्यामुळे घर सोडण्याचा निर्णय घेतला. कतरिना-रणबीर हे 6-7 वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले.
एका मुलाखतीमध्ये ऋषी कपूर यांनी मान्य केले होते की रणबीर याने काही काळासाठी घर सोडले होते. पण घर सोडण्यामागचे खरे कारण काय होते हे अजूनही समजले नाही.