सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा स्पष्टपणे बोलतो. आता,अभिनेत्याने वडील होण्याच्या त्याच्या योजनांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत आणि वडील होऊ शकत नसल्याबद्दल भारतातील कायद्यांना दोष दिला आहे. अभिनेत्याने त्याच्या लग्नाच्या योजनांबद्दलही सांगितले.
एका नवीन मुलाखतीत सलमानने सांगितले की, त्याने एकदा मूल होण्याचा विचार केला होता पण ‘भारतातील कायद्यांमुळे’ त्याला ते शक्य झाले नाही.
सलमानचे मुलांवरील प्रेम हे काही गुपित नाही आणि त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ, त्याच्या भाची आणि पुतण्यांसोबत वेळ घालवताना, इंटरनेटवर प्रसिद्ध झाले आहेत.
सलमानची बहीण अर्पिता खान हिला आयत शर्मा आणि अहिल शर्मा ही दोन मुले आहेत. सलमानची दुसरी बहीण अलविरा खान हिलाही दोन मुले आहेत. अलिझेह अग्निहोत्री आणि अयान अग्निहोत्री. तसेच त्याचे भाऊ सोहेल आणि अरबाज यांनाही मुलगे आहेत. आणि या मुलांवर माझं अतिशय प्रेम आहे.
इंडिया टीव्हीच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत सलमानने मुलाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले आणि म्हणाला, “अभी क्या बोलू वो तो प्लान था. सिर्फ प्लॅन हि था. आणि हा प्लॅन सुनेसाठी नव्हता तर बाळासाठी होता. पुढे सलमान म्हणतो, काय सांगू, ही तर प्लॅनिंग योजना होती. ती सुनेसाठी नव्हती, तर मुलासाठी होती. पण भारतीय कायद्यानुसार ते शक्य होत नाही. तर आता यावर काय करायचं ते बघू.”