बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिद सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर नवनवीन अपडेट तो त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. दरम्यान, अशातच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे शाहिद चर्चेत आला आहे. ज्यात त्याने त्याच्या चित्रपटांबाबत मोकळेपणाने भाष्य केले आहे.
सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही मी घरी बसून होतो
या मुलाखतीत शाहिद म्हणाला की, आजवर अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर अनेकांना वाटतं की, “या अभिनेत्याकडे आता चित्रपटांची लाईन लागेल. पण माझ्याबाबतीच तसं काहीही होत नाही. मी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत 2 चित्रपट सर्वाधिक हिट दिले आहेत. ज्यातील पहिला चित्रपट विवाह हा होता जो जवळपास 25 आठवडे चालला. त्यावेळी अनेकांनी माझं कौतुक केलं. मात्र, त्यानंतर 6 महिने मी घरी बसलो होतो. माझ्याकडे कोणताच नवा चित्रपट आला नव्हता. कारण मला नक्की कोणता रोल द्यायचा हेच दिग्दर्शकांना कळत नव्हतं. त्यानंतर माझ्या दुसऱ्या सुपरहिट कबीर सिंग चित्रपटानंतरही तसंच झालं. त्यानंतरचे काही दिवस देखील मी घरी बसूनच होतो.”
पुढे शाहिद म्हणाला की, पण मजेशीर गोष्ट अशी की, अनेकदा माझे चित्रपट फ्लॉप होऊनही माझ्याकडे 4-5 चित्रपट यायचे, पण कधी-कधी चित्रपट हिट होऊनही मला काम मिळायचे नाही. दरम्यान, यापूर्वी शाहिद कपूर ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘फर्जी’ मध्ये दिसला होता. आगामी काळात त्याचा ‘योद्धा’ आणि ‘ब्लडी डॅडी’ देखील प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :