घरताज्या घडामोडीसोनाक्षीने 'रामायणा'शी संबंधित प्रश्नाचं दिलं भन्नाट उत्तर!

सोनाक्षीने ‘रामायणा’शी संबंधित प्रश्नाचं दिलं भन्नाट उत्तर!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला केबीसीमध्ये रामायण संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचे तिला उत्तर देता आल नव्हतं. त्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आलं होत. हा प्रश्न अजूनपर्यंत सोनाक्षीचा पाटलाग करत आहे. आज एका चाहत्याने तिला याच संदर्भात प्रश्न इन्स्टाग्रामवर विचारला आहे. रामायणात संजीवनी वटी कोणी आणली होती? याच सोनाक्षीने चाहत्याला चांगलचं उत्तर दिलं आहे.

या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली की, बहुतेकांचे प्रश्न रामायणाशी संबंधित आहेत. त्यामुळे दूरदर्शन पाहा. तुम्हाला उत्तर मिळेल. जय बजरंग बळी. यापूर्वी मुकेश खन्नाने तिच्या पौराणिक ज्ञानावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी मुकेश खन्ना यांच्यावर टीका केली होती.

- Advertisement -

सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, सोनाक्षी रामायणाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही, याचा ज्या कुणाला त्रास होत आहे. मी त्यांनाच विचारतो तुम्ही काय पौराणिकतेतील विशेतज्ज्ञ आहात का?’ फक्त ‘रामायण’शी संबंधित प्रश्नाचे उत्तर न दिल्याने सोनाक्षीला अपात्र ठरवले जाऊ शकत नाही. तिला कोणाकडूनही प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. ती स्वत:च्या बळावर स्टार झाली आहे. ती अशी मुलगी आहे की प्रत्येक वडिलांना तिचा अभिमान वाटू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – ‘रामायण’,’महाभारत’च्या यशानंतर बच्चेकंपनीसाठी दूरदर्शनवर येणार ‘छोटा भीम’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -