घरमनोरंजन'गठबंधन'ने दुहेरी शतक ठोकले

‘गठबंधन’ने दुहेरी शतक ठोकले

Subscribe

गठबंधन या मालिकेचा नुकताच २०० भागांचा टप्पा पार

कलर्स वाहिनीवरील गठबंधन या मालिकेचा नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला असून मनोरंजनाचा अनोखा उत्सव साजरा केला जात आहे. सर्व कलाकारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि प्रयत्नांमुळे मिळालेल्या या यशासाठी, त्यांना धन्यवाद देत मालिकेच्या टीमने एक विशेष केक कापून हा आनंद साजरा केला. एक डॉन आणि आयपीएस ऑफिसर यांची अपारंपारिक प्रेमकथा असलेली ही मालिका वेगळ्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रघू (अब्रार काझी) आणि धनक (श्रुती शर्मा) यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी बनली आहे तर मालिकेचा केंद्रबिंदू असलेली सावित्री माईने (सोनाली नाईक) सुध्दा तिच्या विक्षिप्त भूमिकेने अनेकांची मने जिंकली आहेत.

“गठबंधन मध्ये आम्ही आमच्या प्रेक्षकांना एक नवी कहाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांच्या सतत, आणि अखंड पाठिंब्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही भविष्यातही त्यांच्याशी असेच मजबूत नाते बनविण्याचा प्रयत्न करत आहोत.”, असे मालिकेच्या यशाने आनंदित झालेली श्रुती शर्मा ऊर्फ धनकने सांगितले.

- Advertisement -

अब्रार काझीची भूमिका करणारा रघू या मालिकेचे २०० भाग पुर्ण झाल्याने गर्वाने म्हणाला की, ”आमच्या परिश्रमांचे कौतुक करणाऱ्या आणि नेहमीच आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या प्रेमळ प्रेक्षकांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. त्यांच्या पाठिंबा आणि प्रेमाशिवाय हा प्रवास अशक्य होता. गठबंधन सारख्या मालिकेमध्ये सहभागी झाल्याचा मला खूप आनंद होत आहे आणि इतक्या प्रेमळ मालिकेत मध्ये सहभागी होण्याची संधी मला देण्यासाठी मी वाहिनीचा आभारी आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -