राजस्थानच्या सवाई मधोपूर जिल्हातील चौथ बरवाडा येथे अभिनेत्री कतरिना आणि विक्की कौशल यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. ९ डिसेंबरला दोघे विवाह बंधनात अडकले. ६ डिसेंबरला विक्की आणि कतरिना चौथ बरवाडा हॉटेल सिक्स सेंसमध्ये पोहचले होते सलग ३ दिवस दोघांचे लग्न विधी सुरू होते. दोघांचे लग्न राजेशाही थाटात पार पडले असून आता दोघेही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. शुक्रवारी सकाळी विक्की आणि कतरिना आपल्या कुटुंबासोबत हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दोघांच्या लग्नात कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नये यासाठी पाहुण्यांसोबत करार करण्यात आला होता. मात्र तरी देखील दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.
हॉटेल सिक्स सेंसमध्ये इतक्या राजेशाही थाटात झालेले हे पहिले लग्न होते. हॉटेलचे काही काम अजूनही सुरू आहे. विक्की कतरिना लग्नासाठी राजस्थान जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची खास बैठक बोलावली होती. कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडू नये यासाठी राजस्थान पोलीस जागो जागी तैनात करण्यात आले होते. विक्की कतरिनाच्या लग्नाच्या रात्री हॉटेलच्या बाहेर काही मुलांना मिठाई वाटण्यात आली.
विक्की कतरिनाने ई टाइम कंपनी अँमेझॉनशी केलेल्या करारामुळे लोकांसमोर येता आले नाही. लग्नात आलेल्या नातेवाईकांच्या नावांसाठी देखील कोड देण्यात आले होते. कोणाचीही नावे लिस्टमध्ये देण्यात आली नाहीत. दोघांच्या लग्नाला मोठे सेलिब्रेटी किंवा पाहुणे आले नव्हते. लग्नात येणाऱ्या १२० जणांची यादी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली होती. त्यातील केवळ ७० लोकांनीच हजेरी लावली होती.
हेही वाचा – Vicky Katrinaच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा मिस्टर अँड मिसेस Kaushalची पहिली झलक