घरमनोरंजनए है मोहब्बते मालिकेचे १५०० एपिसोड पूर्ण

ए है मोहब्बते मालिकेचे १५०० एपिसोड पूर्ण

Subscribe

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ’ये है मोहब्बतें’ या मालिकेने अलीकडेच १५०० एपिसोड्सचा यशस्वी टप्पा पूर्ण केला. मालिकेचे १५०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत शोच्या स्टारकास्टने भरपूर धमाल-मस्ती आणि डान्स केला.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ’ये है मोहब्बतें’ या मालिकेने अलीकडेच १५०० एपिसोड्सचा यशस्वी टप्पा पूर्ण केला. मालिकेचे १५०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत शोच्या स्टारकास्टने भरपूर धमाल-मस्ती आणि डान्स केला. शोमध्ये इशिताचे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने पार्टीत ढोलवर ताल धरला. पार्टीत करण पटेल, अनीता हसनंदानी, शिरीन मिर्जा, अदिति भाटिया, कृष्णा मुखर्जी यांनी भरपूर डान्स मस्ती केली.

शोची निर्माती एकता कपूरने दिव्यांका त्रिपाठीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर करुन ’1500 episodes of Ishima ! Thankuuuu’ असे लिहिले. हा शो छोट्या पडद्यावर २०१३ मध्ये दाखल झाला होता. या मालिकेच्या माध्यमातून दिव्यांका त्रिपाठी ही अभिनेत्री नावारुपाला आली आहे. त्यामुळे सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये दिव्यांकाच नाव आवर्जुन घेतलं जातं. या मालिकेमध्ये दिव्यांका एक डॉक्टर असण्याबरोबरच एक उत्तम सुन, आई, मुलगी,पत्नी अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना दिसत आहे. या मालिकेने नुकतेच १५०० भाग पूर्ण केलं असून त्यानिमित्ताने आयोजित एका पार्टीमध्ये दिव्यांकाने प्रचंड मौजमस्ती केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ये है मोहब्बते’मध्ये दिव्यांका एका मद्रासी कुटुंबातील मुलगी असून तिचं लग्न पंजाबी कुटुंबामध्ये झालं आहे. त्यामुळे या पंजाबी परिवाराचा काहीसा परिणाम दिव्यांकावरही झाला असून पार्टीमध्ये तिने चक्क पंजाबी स्टाईलचा डान्स केला आहे.

- Advertisement -

दरम्यान या मालिकेतील मुख्य अभिनेत्री दिव्यांकाने १५०० एपिसोड पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करतांना म्हटले की, जेव्हा एखादी यात्रा खूप चांगली होते तेव्हा वेळ कसा गेला ते कळत नाही. या मलिकेचे सुद्धा तसेच आहे. आम्ही या मालिकेत काम करण्याचा खूप आनंद घेत आहोत. या मालिकेच्या शुटिंगमध्ये जवळपास ५ वर्षांचा काळ कसा गेला हे आम्हाला कळलेच नाही.तसेच दिव्यांकाने म्हटले की, ही मालिका सर्वांसाठी भाग्यदायी आहे. या मालिकेमुळे सर्वच कलाकार खूप खूश आहेत. सर्वाच्या जिवनात आनंदायी घटना घडल्यात. या ५ वर्षाच्या काळात मालिकेतील अनेकांची लग्ने जुळली व झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -