वास्तू शास्त्रानुसार घराची बनावट वास्तुच्या नियमांनुसार व्हायला हवी, नाहीतर घरामध्ये सतत कलह, आरोग्याची समस्या, आर्थिक चणचण अशा समस्या सुरु होतात. घरातील स्वयंपाक घराला देखील हा नियम लागू होतो. स्वयंपाक घरामध्ये देखील वास्तूच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असतं. सोबतच स्वयंपाकघरामध्ये कधीही अशा काही गोष्टी ठेऊ नये ज्यामुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल.
स्वयंपाकघरात कधीही ठेऊ नका ‘या’ गोष्टी
औषधं
स्वयंपाकघरात औषधं ठेवणं अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की, स्वयंपाकघरात औषधं ठेवल्याने घरातील व्यक्तींना सतत आजारपणाचा सामना करावा लागू शकतो.
फुटलेली भांडी
स्वयंपाकघरात कधीही फुटलेली भांडी ठेवू नये. असं म्हणतात फुटलेल्या भांड्यांमुळे घरात दरिद्रता येते. तसेच घरात सतत वाद-विवाद सुरु राहतात.
कणिक
वास्तू शास्त्रानुसार, फ्रिजमध्ये मळून ठेवलेली कणिक ठेवणं अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की, यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच शिळ्या कणकेच्या चपात्या खाल्ल्याने कॅन्सर सारखे आजार निर्माण होतात.
मंदिर
स्वयंपाक घरामध्ये कधीही मंदिर ठेऊ नये. वास्तू शास्त्रात हे अशुभ मानलं जातं. कारण स्वयंपाक घरात आपण कांदा-लसूण तसेच मासांहार शिजवतो. तिथेच देवी-देवतांची मूर्ती फोटो असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते.
हेही वाचा :