घरलोकसभा २०१९माझ्या कुटुंबातूनही पंतप्रधान झाले, पण मोदींनी देशाचा सन्मान वाढवला

माझ्या कुटुंबातूनही पंतप्रधान झाले, पण मोदींनी देशाचा सन्मान वाढवला

Subscribe

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी निवडणूक प्रचारसभेतून गांधी घराण्यावरच टीका केली आहे. आमच्या कुटुंबानेही पंतप्रधान दिले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा सन्मान वाढवला असून मोदी केवळ देशासाठीच जगत आहेत, असे भाजपचे सुलतानपूरचे खासदार वरुण गांधी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथील एका प्रचार सभेला संबोधित करताना वरुण गांधी बोलत होते.

माझ्या कुटुंबातील काही लोक पंतप्रधान झाले आहेत. पण मोदींनी देशाचा जो सन्मान वाढवला तसा बर्‍याच वर्षांपासून कुणीही वाढवलेला नाही. मोदी केवळ देशासाठी जगत आहेत आणि देशासाठीच प्राणही देतील. त्यांना केवळ देशाचीच चिंता आहे, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

वरुण गांधी स्वत: गांधी कुटुंबातील असल्याने त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय झाल्याने वरुण गांधी काँग्रेसमध्ये सामिल होतील, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत खंडण केले आहे. ज्या दिवशी भाजपला सोडचिठ्ठी देईन, त्याच दिवशी राजकारणातून संन्यास घेईन, असे त्यांनी याआधी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -