घरमहाराष्ट्रविविध जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान, ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध

विविध जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान, ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध

Subscribe

मुंबई – राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.

राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. 19 सप्टेंबर) होईल.

- Advertisement -

ग्रामपंचायतींची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या

नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75

धुळे: शिरपूर- 33

- Advertisement -

जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02

बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03, लोणार- 02

अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01

वाशीम: कारंजा- 04

अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01

यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08

नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01

हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04

नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17

पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02

अहमदनगर: अकोले- 45

लातूर: अहमदपूर- 01

सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08

कोल्हापूर: कागल- 01

एकूण 608 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -