घरमहाराष्ट्रगद्दारी करून तिकडे गेले काय मिळाले?, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

गद्दारी करून तिकडे गेले काय मिळाले?, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

Subscribe

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे . जळगाव मधील पाचोऱ्यात आज आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेशी शिव संवाद साधला. भर पावसात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी या सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना ‘महाराष्ट्रात कट रचलाय शिवसेनेला संपवण्याचा, आम्हाला एकटे पडण्याचा . तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का?’ असा प्रश्न जळगावकरांना करताचा उपस्थित शिवसैनिक आणि नागरिकांनी घोषणा देत आपला पाठिंबा कायम सोबत असल्याचे दाखवून दिले.

पाचोऱ्यातील सभेत बोलताना ‘महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी झाली . आणि गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे, आणि त्यांना ठाऊक आहे कोण विकास कामे करतं, खरं बोलतं, आणि कोण खोटं बोलतं ते. देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही . त्यामुळे हे गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरचे कोसळणार म्हणजे कोसळणार’ असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .

- Advertisement -

गद्दाराच्या मतदार संघात जाऊन गदाराबद्दल सांगणार – आदित्य ठाकरे

सरकार गेल्याच दुःख नाही, ते परत आणाल तुम्ही. पण प्रगतिशील महाराष्ट्र रोखण्याच काम यांनी केले. कोविड काळात आपला जनतेचा जीव वाचवण्याच काम उद्धव साहेबांनी केले, याचं जगाने कौतुक केले. महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांचे काय होईल म्हणून त्यांच्या पोटात दुखत असेल. कोणत्याही जाती धर्मात वाद न लावणारे आपले हिंदुत्व आहे. देशात आपले नाव होत होते हेच त्यांच्या पोटात दुखले. बंड करायला हिम्मत लागते, यांनी गद्दारी केली. गुवाहातीला गेले, तिकडे काय काय केले आपण पाहिले. गुवाहातील गेल्यावर 40 गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक समजत होते, मजा करत होते, पण तिथला पूर त्यांना नाही दिसला. हिंदुत्वासाठी गेले नाहीत, एक दोन लोकांच्या स्वरथासाठी गेले.

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या सुपुत्राने राजीनामा दिला, तेव्हा टेबलावर चढून बार मधे नाचतात तसे हातवारे करत नाचत होते. उद्धव साहेबांची शस्त्रक्रिया झाली तेव्हा या 40 जणांनी काम करण्या ऐवजी आपले सरकार उभारायची स्वप्न पाहिली, कोणी आपल्या आई वडील वा गुरू बाबत असे करेल का? स्वतःला खोके कसे मिळतील ? स्वतःच ओके कसे होईल ते पाहत होते हे. पहिली गद्दारांनी बॅच गेली, त्या पैकी किती जणांना मंत्री पद मिळाले ? आपल्याकडे याना चांगले पद दिली होती, तिकडे जाऊन काय मिळाले? हीच त्यांची लायकी होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -