घरताज्या घडामोडी'या' तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत, महायुतीच्या चर्चेवरून अंबादास दानवेंची टीका

‘या’ तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत, महायुतीच्या चर्चेवरून अंबादास दानवेंची टीका

Subscribe

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल शुक्रवारी शिवाजी पार्कवर एकत्र आले होते. मनसेकडून दीपोत्सोवाचा कार्यक्रम शिवाजी पार्कवर साजरा करण्यात आला. यावेळी हे तिघेही नेते एकत्र आले होते. दरम्यान, या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भोंग्यांचं काय झालं? टोलचं काय झालं? असे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांची दहशत आहे. त्यामुळेच ते महापालिका निवडणुकीत एकत्र येतील, असं अंबादास दानवे म्हणाले.

- Advertisement -

या तिघांना लोकं मोठे नेते का म्हणतात? हेच मला कळत नाही. एकजण 40 आमदार घेऊन बाहेर पडला. यात कसला आला मोठेपणा? याला गद्दारी म्हणतात, असं म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.


हेही वाचा : कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली; वाहतुकीचा खोळंबा

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -