राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार ही अफवा असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा आहे. ही अफवा विरोधक पसरवत असून ही चर्चा खोटी आणि बिनबुडाची असल्याचं नवाब मलिक म्हणाले. विशेष म्हणजे भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जाणार असल्याच्या चर्चेवर नवाब मलिक यांनी ट्वीट करत पक्षाची भूमिका मांडली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन सार्वजनिक केला जाईल.”
कुछ लोग 12 एनसीपी विधायकों की बीजेपी में जाने की अफवाह फैला रहें है, यह बे बुनियाद और मनगढन्त खबर है,
उलट चुनाव से पहले बीजेपी में गए विधायक एनसीपी में लौटने के लिए आतूर हैं लेकिन इस पर अभी कोई फैसला नहीं हुआ है जल्द फैसला कर जानकारी सार्वजनिक की जाए गी ।@PTI_News @ani_digital— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 10, 2020
“काही जण राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवत आहेत. त्यावर खुलासा आम्ही केला आहे. काही जणांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. काही आमदार शरद पवारांना, अजित दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून याबाबत चर्चा करत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
हेही वाचा – वाढीव बिलासाठी रुग्णालयाने अडवलं; सेनेच्या नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना थेट उचलून आणलं!