घरताज्या घडामोडीBJP Morcha : दाऊद कनेक्शन असणाऱ्या मलिकांना मुख्यमंत्री ठाकरे वाचवताहेत, कुठे गेला...

BJP Morcha : दाऊद कनेक्शन असणाऱ्या मलिकांना मुख्यमंत्री ठाकरे वाचवताहेत, कुठे गेला ठाकरी बाणा?, दरेकरांचा घणाघात

Subscribe

महात्मा गांधी यांनी अहिंसेचा पुरस्कार केला. त्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर संपूर्ण सरकार देशद्रोहीला पाठीशी घालण्यासाठी बसतात. उपमुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा त्यांच्यासोबत बसतात. आमचे महात्मा गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाऊद कनेक्शन असणाऱ्या नवाब मलिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेबांचा ठाकरी बाणा कुठे गेला? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच देशद्रोहीला वाचवण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहेत. परंतु राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. मुंबईतील बॉम्ब स्फोटात सामील असलेल्यांकडून नवाब मलिकांनी जमीन खरेदी केली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं केली परंतु ठाकरे सरकारला पाझर फुटला नाही असे प्रवीण दरेकर म्हणाले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपकडून आझाद मैदानावर विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संवाद साधताना ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. देशद्रोही नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आणि देशद्रोही नवाब मलिकांना पाठीशी घालण्यासाठी या मोर्चास ज्यांचे नेतृत्व आहे. त्यांना जागा दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने मुंबई आणि ठाण्यातून लोकं आले आहेत. मला या ठाकरे सरकारची लाज वाटत आहे. ठाकरेंना विचारु इच्छितो तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

- Advertisement -

गेंड्याच्या कातडीच्या सरकारला पाझर फुटला नाही

ज्या दाऊदच्या साथीदारांनी मुंबईत बॉम्ब स्फोट केला त्या साथीदारांची जागा नवाब मलिक खरेदी करतात. देशद्रोही कटात असल्याचे सिद्ध होते. न्यायालयाच्या आदेशाने ते जेलमध्ये जातात. विधिमंडळाच्या सभागृहात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आकांड तांडव केलं परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला अद्याप पाझर फुटला नाही. मुंबईमध्ये रक्ताच्या थारोळ्यात झालेला स्फोट त्याची लाज या सरकारला वाटत नाही. उलट सरकार सांगत आहे की, नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. सरकारची मस्ती चालणार नाही. जनसागर राजीनामा घेण्यासाठी लोटला आहे. राजीनामा घेतल्याशिवाय खुर्चीवर बसता येणार नाही. हे सांगण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला असल्याचे दरेकर म्हणाले.

गांधीजी असते तर तुम्हाला फासावर लटकवलं असतं

१९९३ च्या बॉम्ब स्फोटामध्ये मुंबईकर रक्ताच्या थारोळ्यात होता. त्या देशद्रोह्याला पाठीशी घालण्याचे काम करत आहात. आता जनता रस्त्यावर उतरली आहे. नुसतं पाठीशी घालत नाही. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा पुरस्कार केला. त्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर संपूर्ण सरकार देशद्रोहीला पाठीशी घालण्यासाठी बसतात. उपमुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा त्यांच्यासोबत बसतात. आमचे महात्मा गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते.

- Advertisement -

देशद्रोही प्रवृत्ती फडणवीस संपवल्याशिवाय राहणार नाहीत

तुम्हाला न्यायालय सजा देते, तुरुंगात पाटवत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यात येते. परंतु फडणवीसांनी विधिमंडळात खुलेआम तुमचे कपडे उतरवले आहेत. या सरकारचा वापर कशा पद्धतीने करत आहात याबाबत सांगण्याचे काम सभागृहात त्यांनी पुराव्यासहीत केले आहे. फडणवीसांना संपवू शकत नाही परंतु एक खरं आहे. अशा प्रकारच्या देशद्रोही प्रवृत्ती देवेंद्र फडणवीस संपवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास सगळ्यांना आहे.

सत्तेला लाथ मारुन ठाकरी बाणा गिरवावा

पुन्हा एकदा सत्तेला लाथ मारुन बाळासाहेबांचा किस्सा, कित्ता आणि ठाकरी बाणा मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी गिरवावा असे आवाहन करतो. नाहीतर शरद पवार असो उद्धव ठाकरे असो या जनतेचा संताप एवढा जास्त आहे की, तुमचे सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.


हेही वाचा : मुंबई महापालिकेवर भाजपचा स्वबळावर महापौर, भाजप 134 जागा जिंकणार, आशिष शेलारांचा मोठा दावा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -