घरमहाराष्ट्रमोदी श्रीमंत लोकांची चौकीदारी करतात - राहुल गांधी

मोदी श्रीमंत लोकांची चौकीदारी करतात – राहुल गांधी

Subscribe

या चौकीदारने भारतातील सर्वांत श्रीमंत लोकांची चौकीदारी केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी चंद्रपूरमध्ये आले आहेत. चंद्रपूरमध्ये राहुल गांधी यांची जाहीर सभा सुरू आहे. चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर जाहीर सभा सुरु आहे. या सभे दरम्यान राहुल गांधी यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन भाषणाला सुरुवात केली आहे. या सभे दरम्यान त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

- Advertisement -

सर्वांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आले का असा सवाल करत राहुल गांधी यांनी सर्वांना प्रश्न उपस्थित केला. मोदी सरकारने फक्त आश्वासन दिले. मोदी चोरांना पैसे देत आहेत. नीरव मोदी, अनिल अंबानी, अदानी यांना मोदींनी पैसे दिले. मोदींनी १५ लोकांना करोडो रुपये दिले. १५ लाख रुपये तुमच्या बँक अकाऊंटमध्ये टाकले जाऊ शकत नाही. जर १५ लाख टाकले तर भारताची अर्थव्यवस्था ठप्प होऊन जाईल.

२०१९ च्या निवडणुकीनंतर ज्याची महिन्याची कमाई १२ हजारापेक्षा कमी आहे त्याच्या बँक अकाऊंटमध्ये वर्षाला ७२ हजार रुपये टाकले जाणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. २५ कोटी कुटुंब ५ कोटी लोकांच्या बँक अकाऊंटमध्ये आम्ही पैसे यासाठी नाही टाकत की मोदी सरकारने तुम्हाला आश्वासन दिले. मोदी सरकारने ५ वर्षात लाखो लोकांना पैसा दिला आहे. विदर्भातली जनता कर्जमाफी मागते, आत्महत्या करतात. मात्र कर्जमाफीचे आश्वासन देऊन ही कर्जमाफी झाली नाही.

- Advertisement -

‘मला पंतप्रधान नका बनवू मला चौकीदार बनवा असे मोदी म्हणतात. या चौकीदारने भारतातील सर्वांत श्रीमंत लोकांची चौकीदारी केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अच्छे दिन आल्याची आधी घोषणा केली जायची आता चौकीदाराची घोषणा केली जाते. या चौकीदाराने करोडो रुपये अनील अंबानी यांना दिले असल्याचा आरोप राहुल यांनी केले आहे.

निवडणुक जिंकल्यानंतर १० दिवसाच्या आत काँग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले. या देशात पैशाची काही कमी नाही मात्र तुमाला खोटे बोलले जाते. मजूर, शेतकरी पैसे मागत असेल तर त्यांच्यासाठी पैसे कमी मात्र अनिल अंबानी यांनी पैसे मागितले तर पैशांची काहीच कमी नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

‘मोदी दोन भारत बनवू इच्छित आहेत. एक अनिल अंबानी, नीरव मोदी, अदानी यांचा भारत आणि दुसरा गरिब, मध्यमवर्गीय यांचा भारत मोदी बनवू इच्छित असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आज या सर्व भागातील उद्योगधंदे बंद झाले आहेत. काळ्यापैशांविरोधातील लढाई होती आपण सर्व बँकेबाहेर रांगेत उभे होते. या रांगेत अंबानी, नीरव मोदी, अदानी नव्हते. सगळ्या भ्रष्टाचारींनी काळापैसा पांढरा करून घेतल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. जीएसटीचा फायदा कोणला झाला. महागाई वाढत चालली आहे.

नीरव मोदी, चौक्सी, अंबानी बँकेकडून कर्ज घेतात आणि बुडवतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र शेतकरी कर्ज घेऊन भरू शकला नाही तर त्यांना जेलमध्ये टाकले जाते. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय का असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. २०१९ नंतर शेतकऱ्यांना कर्ज भरले नाही म्हणून जेलमध्ये जावे लागणार नसल्याचे आवाहन राहुल गांधी यांनी दिले आहे.

‘तुम्हाला सांगितले जाते पैशांची कमी आहे. शेतकऱ्यांना पैसा दिला जाऊ शकत, तरुणांना कर्ज दिले जाऊ शकत नाही. मनरेगा योजनेला चालवायला ३५ हजार कोटी रुपये खर्च होतो. या एका मनरेगाचा पैसा नीरव मोदी घेऊन फरार झाला. काँग्रेस पक्ष आल्यावर जो पैसा १५ जणांकडे जात आहे तो पैसा मी वर्षाच्या ७२ हजार रुपये जनतेच्या अकाऊंटमध्ये टाकणार आहे. हे फक्त आश्वासन नाही तर हे मी करुन दाखवणार आहे. देशातल्या कंपन्या बंद पडल्या कारण देशात मोदीने नोटाबंदी केली.’

मोदींनी तुमच्या खिशातले पैसे काढले मात्र मी तुमच्या खिशात पैसे टाकणार आहे. मोदी जिकडे जातात तिकडे दुसऱ्यांवर टीका करतात. मोदींचे गुरु असलेल्या अडवाणींना त्यांनी स्टेजवरुन उचलून फेकून दिले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस जिकडे जाते तिकडे प्रेमाची भाषा करतात, न्यायाची भाषा करतात मात्र मोदी दुसऱ्यावर टीका करण्याचेच काम करतात. २०१९ ला काँग्रेसचे सरकार येणार हे खरं आहे. सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे घेऊन जायचे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -