मुंबई : मुबंईतील शिवाजी पार्क मैदानावर विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची शनिवारी पहिली सभा झाली. या सभेच्या माध्यमातून इंडियाने लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावरून आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर रंगले आहेत. यातूनच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार Adv. आशिष शेलार यांना गेट वेल सून, असे म्हटले आहे.
हेही वाचा – Thackeray group : …या हुकूमशाही नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर घणाघात
अब की बार भाजपा तडीपार, असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आमची लढाई लोकशाही वाचविण्याची, संविधान वाचविण्याची तसेच हुकूमशहाच्या विरोधातील आहे. नरेंद्र मोदी आमच्यावर घराणेशाहीवरून टीका करतात. मात्र त्यांच्या परिवारामध्ये ते आणि त्यांची खुर्ची, एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा सवाल त्यांनी केला होता.
आशिष जी, आपली आणि अन्य भाजपा नेत्यांच्या आदळआपट आणि तळतळाटीतून पोटशूळ स्पष्ट दिसतो. काँग्रेस पक्ष जेव्हा एकत्र येतो तेव्हा ते केवळ ‘दल’ एकत्र येणे नसते तर ‘दिल’ एकत्र येणे असते. आम्ही तुमच्या पक्षासारखे आश्वासन देऊन पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा इडी, सीबीआय च्या धमक्या देऊन… https://t.co/vAptB1Y6Py
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 20, 2024
त्याला प्रत्युत्तर देताना आमदार आशिष शेलार यांनी, आपल्याला हवे तेवढे शिवतीर्थावर भाषण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा ‘न्याय’ मिळाला, अशी टीका केली होती. शिवाय, उद्धव ठाकरे यांना आपल्या भाषणाची सुरुवात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
हेही वाचा – Modi Govt : तिसऱ्या कार्यकाळाची दिवास्वप्ने पाहिली जातायत, ठाकरे गटाची मोदींवर टीका
या वादात आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उडी घेतली आहे. आशिष शेलार आणि अन्य भाजपा नेत्यांच्या आदळआपट आणि तळतळाटीतून पोटशूळ स्पष्ट दिसतो. काँग्रेस पक्ष जेव्हा एकत्र येतो तेव्हा ते केवळ ‘दल’ एकत्र येणे नसते तर ‘दिल’ एकत्र येणे असते. आम्ही तुमच्या पक्षासारखे आश्वासन देऊन पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा ईडी, सीबीआयच्या धमक्या देऊन ब्लॅकमेल करत नाहीत, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून ‘दिल एकत्र आले आहेत’ हे दाखवून दिले. आता एकदिलाने भाजपाच्या हुकूमशाहीचा आणि दमनशाहीचा पाडाव करणार म्हणूनच तुमची लहान मुलांसारखे पाय आपटून रडारड सुरू आहे. त्यामुळे Get well soon, असा टोला त्यांनी शेलार यांना लगावला आहे. शिवाय, सावरकरांना नकारात्मक प्रतिक्रियात्मक हिंदुत्व म्हणत, मुस्लीम लीगची राष्ट्रविरोधी हिंदू प्रतिमूर्ती म्हणणाऱ्या गोळवलकरांचा मर्दासारखा निषेध कधी करणार? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा – Aaditya Thackeray : भ्रष्ट आयुक्तांवरचे प्रेम अचंबित करणारे, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका