हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चार्ज मागितल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. अजित पवारांकडे मुख्यमंत्रिपदाचा चार्ज दिला तर अधिवेशन संपण्याआधी ४ दिवसात राज्य विकून टाकतील, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
जर तुम्ही त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चार्ज दिला तर…
गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाबाहेरील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, अजित पवारांकडे मुख्यमंत्रिपदाचा चार्ज देणं म्हणजे अधिवेशन संपण्याअगोदर महाराष्ट्र विकून टाकतील. माझं स्पष्ट मत आहे की, त्यांच्याकडे कशाला चार्ज देत आहात. कारण सरकारमधला तुम्ही त्यांना काही भाग दिला आहे. २ लाख ५० हजार कोटींच्या वरचा निधी त्यांनी त्यांच्या लोकांना दिला आहे. जर तुम्ही त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चार्ज दिला. तर हे राज्य विकून खातील. दुसरं काहीही करू शकत नाहीत, अशी खरमरीत टीका पडळकरांनी अजित पवारांकडे केली आहे.
हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोहोचतं?
राज्यात विद्यार्थ्यी फक्त भाजपचेच आहेत का, प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत. मात्र, हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोहोचतं. या घोटाळ्यात तुमच्याच काही लोकांचा समावेश असेल. त्यामुळे पोलीस कशी चौकशी करणार, असा सवाल करत सीबीआय चौकशी केली तर बिघडलं कुठे?, तुम्ही जर काहीही केलं नसेल तर सीबीआय चौकशी करू द्या ना, असं देखील पडळकर म्हणाले.