घरमहाराष्ट्रज्युलिओ रिबेरोंचा 'यामुळे' लेटरबॉम्ब प्रकरणाची चौकशी करण्यास नकार

ज्युलिओ रिबेरोंचा ‘यामुळे’ लेटरबॉम्ब प्रकरणाची चौकशी करण्यास नकार

Subscribe

ज्यूलिओ रिबेरो कोण आहेत?

राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब म्हणजेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर राज्यात एकच चर्चांचा भूकंप आला आहे. राजकीय फैरी जडल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पत्राच्या आणि गंभीर आरोपाची चौकशी माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी करावी असे म्हटले होते. यावर माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला आहे. रिबेरो यांनी म्हटले आहे की, मला या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज नाही. या प्रकरणात अद्याप कोणा विषयीही कोणासोबत चर्चा देखील केली नाही, परंतु शरद पवार यांनी मला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे असे मी ऐकले आहे. त्यांनी आपले वय सांगितले आणि म्हणाले की मी आता ९२ वर्षांचा आहे. या वयात मी कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकत नाही. माझ्याकडे इतकी शक्ती नाही.

तसेच रिबेरो पुढे म्हणाले की, माझ्यामध्ये सामर्थ्य असले तरी मी अशा प्रकरणाची चौकशी केली नसती”. कारण हे अगदी खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. ते म्हणाले की, परंबीरसिंग यांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडायला हवी होती. बदली झाल्यावर ते असे आरोप करीत आहेत. अशा प्रकारच्या पत्रे लिहिणे हे एखाद्या पोलिस अधिकाऱ्याचे काम नाही.

- Advertisement -

परमबीर सिंह यांच्या पत्रावर तुमचा विश्वास आहे का असे रिबेरो यांना विचारले असता. रिबेरो यांनी म्हटले आहे की, अशा अधिकाऱ्यांवर आणि राजकारण्यांवर माझा विश्वास नाही. त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की परंबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला आरोप ही गंभीर आहे त्यामुले यावर दिल्लीती पत्रकार परिषदेत सांगितले होते की या प्रकरणाची चौकसी ज्युलियो रिबेरो यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याने करायला हवी.

- Advertisement -

ज्यूलिओ रिबेरो कोण आहेत?

रिबेरो हे १९५३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
ते मुंबईचे २१ वे पोलिस आयुक्त होते.
१९८२ ते १९८६ पर्यंत ते देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे सीपी होते.
रिबेरो सीआरपीएफचे डीजी होते.
त्यानंतर त्यांची गुजरातचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली.
१९८९ मध्ये ते पोलिस सेवेतून निवृत्त झाले.
भारत सरकारतर्फे त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच एकदम स्वच्छ कार्यकाळ असलेले आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -