घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : "महाराष्ट्राचे गृहमंत्री मनोरुग्ण...", उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर घणाघाती टीका

Uddhav Thackeray : “महाराष्ट्राचे गृहमंत्री मनोरुग्ण…”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर घणाघाती टीका

Subscribe

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी माझ्यासाठी शब्द नाहीत. याआधी मी त्यांना उद्देशून फडतूस शब्द वापरला होता. पण आता तोही तोकडा पडतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली आहे. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

हेही वाचा… Dahisar Firing : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसची सुपारी देऊन हत्या झाली का? उद्धव ठाकरेंना शंका

- Advertisement -

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. याआधी मी त्यांना उद्देशून फडतूस शब्द वापरला होता. पण आता तोही तोकडा पडतोय, असा टोलाच यावेळी ठाकरेंनी लगावला. तर महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री मिळाला आहे का? असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. (“Maharashtra Home Minister is mentally ill…”, Uddhav Thackeray slams Devendra Fadnavis)

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, श्वान गाडीखाली मेले तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात. गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्वच प्राण्यांची आणि माणसांची जबाबदारी येते. एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही श्वानाबरोबर कशी काय करता? असा संतप्त सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

तर, दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलविता, हे जनतेला समजलेले आहेच. पण राज्यात गुंडगिरी करा, खूनखराबा झाला तरी घाबरू नका… पण भाजपात आला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडासाठी मोदी गॅरंटी आहे का? असे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत, असा शाब्दिक हल्ला उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या या टीकेला आता फडणवीस काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी गृहमंत्री असलेल्या फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर फडणवीसांनी म्हटले होते की, उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधी पक्ष गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील. मग अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूसारख्या गंभीर प्रकरणात विरोधी पक्षांनी माझा राजीनामा मागितला असेल, तर मला त्यामध्ये फारसे विशेष असे काही वाटत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -