घरमहाराष्ट्रनाशिकगोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा अलर्ट, दुपारी सोडणार पंधरा हजार क्युसेक पाणी

गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा अलर्ट, दुपारी सोडणार पंधरा हजार क्युसेक पाणी

Subscribe

संततधार पावसामुळे गंगापूर धरण १०० टक्के भरल्याने आज दुपारी बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. आज गंगापूरमधून १५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग केला जाणार असून नदीकाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक विसर्ग होण्याची शक्यता आहे.

पाणी विसर्ग नियोजन

गंगापूर धरणातून
सकाळी ८ वाजता एकूण ५००० क्युसेक,
सकाळी ९ वा. एकूण ७००० क्युसेक,
सकाळी १० वा. १०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तर
पालखेड धरणातुन होणारा विसर्ग स.६:३० वा वाढवून ३ हजार ४९६ क्युसेक इतका करण्यात आला आहे.

कार्यकारी अभियंता नाशिक यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आज १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो १५००० क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने या SOP प्रमाणे सर्व संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत. नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.
– सूरज मांढरे
जिल्हाधिकारी, नाशिक
- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -