घरमहाराष्ट्रनाशिकपाणी नाही तर, मतही नाही

पाणी नाही तर, मतही नाही

Subscribe

श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकार्‍यांना घेराव घातला. तसेच ग्रामस्थांनी ग्रामसभा घेउन पाणी नाही तर मतदानावरही बहिष्काराचा इशारा दिला.

भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील श्रीरामपुर तालुक्यातील आठ गावे आवर्तनाच्या पाण्यापासून वंचित असल्याने श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी गुरुवारी (४ मार्च) पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकार्‍यांना घेराव घातला. तसेच ग्रामस्थांनी ग्रामसभा घेउन पाणी नाही तर मतदानावरही बहिष्काराचा इशारा दिला.

भंडारदरा धरणातून १५ मार्च रोजी आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी, उंदिरगाव, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगाव, वडाळा महादेव, उंबरगावसह राहुरी तालुक्यातील काही गावांना पाणी मिळू शकले नाही. राहाता तालुक्यातील लोणीसह सोनवगाव परिसरही पाण्यापासून वंचित राहिला. त्यामुळे गुरुवारी पाटबंधारेविरोधात शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलन केले. श्रीरामपूरमध्ये शेकडो शेतकरयांनी पाटबंधारेच्या वडाळा उपविभागीय कार्यालयाला घेराव घातला. यानंतर संतापलेल्या शेतकरयांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला. जमावबंदी आदेश लागू झालेले असल्याने यावेळी पोलिसांची कूमक बोलविण्यात आली.

- Advertisement -

भंडारदरा धरणात एक हजार ६०० व निळवंडेत १ हजार १७३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यातील ४५० एमसीएफटी एवढा मृतसाठा आहे. २ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाण्यामध्ये जुलैपर्यंतचे पिण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या साठवण तलावाकरिता पाणी शिल्लक ठेवण्याचे जिल्हाधिकारयांचे आदेश आहेत. प्रत्येकी ७०० एमसीएफटीच्या आवर्तनातून हे तलाव भरले जातील, अशी माहिती देशमुख यांनी दिली. आज सायंकाळी माळेवाडी, उंबरगाव, उंदिरगाव, मुठेवाडगाव येथे ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय होणार आहे. नेते मंडळी व उमेदवारांना गावात येण्यास मज्जाव केला जाणार आहे, अशी माहिती सरपंच सोपान औताडे, जितेंद्र भोसले, अनिल औताडे, विश्वनाथ मुठे, राजेंद्र पाऊलबुद्धे आदी नेत्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -