महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि राज ठाकरेंकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न यावरून भाजपने त्यांचा धसका घेतल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च काँग्रेस, राष्ट्रवादीच्या हिशेबात जमा करण्याची केविलवाणी मागणी केली असावी, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. मनसेचे अध्यक्ष ठाकरे हे त्यांना मोदींच्यातील बदल पटले.
नसल्याने भाजपविरोधात सभा घेत आहेत. ते कुठेही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करीत नाहीत. त्यांना आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनुभव ते सभेत मांडत आहेत. भाजपचा खोटारडेपणा ते जनतेला पुराव्यानिशी दाखवत आहेत. हे जगजाहीर असताना भाजप नेते निवडणूक आयोगाकडे निवेदन पाठवून ठाकरे यांच्या सभांचा खर्च काँग्रेस, राष्ट्रवादीच्या खात्यात समाविष्ट करण्याची केविलवाणी मागणी करीत आहेत.
वास्तविक पाहता राज ठाकरे यांच्या सभांचा आणि आमचा काहीच संबंध नाही, हे भाजपलाही चांगले ठाऊक आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने ते असे बोलत आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.