घरमहाराष्ट्रराजभवनावर 'चक्रम वादळे' आदळतात, राज्यपालांनी सावध रहायला हवं - सामना

राजभवनावर ‘चक्रम वादळे’ आदळतात, राज्यपालांनी सावध रहायला हवं – सामना

Subscribe

राजभावनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवं. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे,” अशी भीती ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरुन मतभेदांचं जाहीर प्रदर्शन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी पदवीच्या अंतिम परीक्षा न घेता मागील सत्रातील गुणआंचे मुल्यांकन करुन सरासरी गुण दिले जातील, असा निर्णय जाहीर केला. हा निर्णय योग्य नसल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. यामुळे आता राज्यात राज्यपाल विरुद्ध सरकार असं चित्र दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणावर ‘सामना’तुन राज्यपालांचे कान टोचले आहेत. “राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवं. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे,” अशी भीती ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेत पोलिसांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावल्याचा दाखलाही अग्रलेखात देण्यात आला आहे. “एक दिवस संतप्त विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर येतील आणि घोळ घालून एक पिढी बरबाद करणाऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्यांना सुनावतील. तुमच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आमचा छळ का करता? बोलण्यासारखं, करण्यासारखं काही नसेल तर तोंड बंद ठेवा,” अशा कानपिचक्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सरकार’ म्हणून एक निर्णय घेतला. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांचे मूल्यांकन करून सरासरी गुण दिले जातील. या निर्णयाचं विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केलं, पण प्रत्येक बाबतीत विरोधच करायचा असं ठरवून काम करीत असलेल्या विरोधी पक्षाने तत्काळ राजभवन गाठलं व परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला. विरोधकांचे पत्र मिळताच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयास विरोध करणारे पत्र लिहिलं, अशी खरमरीत टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.


हेही वाचा – संरक्षण सचिवांमध्ये कोरोनाची लक्षणे, ३५ जणांना केले होम क्वारंटाइन

- Advertisement -

“देशभरात अनेक ‘बडे लोग’ बोगस डिग्री घेऊन राजकारणात वावरत आहेत. ‘कोरोना ग्रॅज्युएट’ होण्यापेक्षा हे बोगस पदवीवले डेंजर. ही यादी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे,” असे टोलेही अग्रलेखातून लगावले आहेत. “कायदा फक्त विद्यापीठालाच नाही, इतर क्षेत्रांनाही लागू आहे. कायद्यानेच कोणी वागायचं म्हटलं, तर जनता साखरझोपेत असताना महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवून एक बेकायदा शपथविधी पार पडला नसता,” असा जोरदार टोला देखील लगावला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -