घरमहाराष्ट्रSambhaji Bhide : संभाजी नावाने बहुजनांच्या पोरांना भडकवतात, अटक व्हायलाच हवी; राष्ट्रवादी...

Sambhaji Bhide : संभाजी नावाने बहुजनांच्या पोरांना भडकवतात, अटक व्हायलाच हवी; राष्ट्रवादी नेत्याची मागणी

Subscribe

Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत संभाजी भिंडेंनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजावरही भाष्य केले. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने (Congress) संभाजी भिडे यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Sambhaji Bhide Inciting the sons of Bahujans in the name of Sambhaji must be arrested The demand of the nationalist leader)

हेही वाचा – असे प्रकार सारखे घडणं गंभीर; पुण्यात तरुणीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, संभाजी भिडे यांना अटक व्हायलाच हवी. त्यांनी जे वक्तव्य केले आहे, ते दुसरे कोणी म्हटले असते तर त्या व्यक्तीला देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी भिडे संभाजी हे नाव वापरून बहुजनांच्या पोरांना भडकवत आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

संभाजी भिडे यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला 15ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही, असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वातंत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा तो कसा दाखल करायचा ते काँग्रेस बघून घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : GST घोटाळ्यातील पैसा टेरर फंडिंगसाठी? पोलिसही करणार चौकशी

काय म्हणाले संभाजी भिडे?

पुण्यातील दिघी येथे 25 जूनला संभाजी भिडेंचे जाहीर व्याख्यान होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने आयोजन केले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा, असं संभाजी भिडे म्हणाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -