घरमहाराष्ट्रAjit Pawar : मुद्द्याचं काय ते बोला; अजित पवार माध्यमांवर बरसले, तर...

Ajit Pawar : मुद्द्याचं काय ते बोला; अजित पवार माध्यमांवर बरसले, तर सुळे म्हणतात, ती बिझी माणसं

Subscribe

पुणे : पुण्यातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. विद्यमान खासदार म्हणून सुप्रिया सुळे देखील या कार्यक्रमाला होत्या. दोघेही एकाच व्यासपीठावर होते, आणि या दोघांच्याही मधल्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते. फडणवीसांशी बोलणाऱ्या, त्यांचे स्वागत करणाऱ्या सुळेंनी अजित पवारांकडे बघण्याचे देखील टाळले. बहीण, भावातला हा दुरावा आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे शुक्रवारी एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची गळाभेट घेतली होती.

थेट उत्तर देणे टाळले

बहीण – भावातील अबोल्याबाबत अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, माध्यमांना बातमीसाठी काही विषय नसतील तर ते असे इतर प्रश्नांकडे लक्ष देत बसतात. तुम्ही मुद्द्याचे प्रश्न विचारणार असाल तर मी उत्तर देतो, असे स्पष्ट शब्दात बजावले. पुणे विमानतळाचे काम कसे केले आहे, नवीन विकासकामे कशी केली जात आहेत, वाहतुकीच्या समस्या सोडविल्या जात आहेत, याकडे माध्यमांचे लक्ष वेधले. मात्र सुप्रिया सुळेंशी संवाद का साधला नाही? याबाबत उत्तर देणे टाळले.

- Advertisement -

हेही वाचा – Arvind Kejriwal : …तर नवऱ्याला जेवायला वाढू नका; केजरीवालांचा महिलांना जगावेगळा सल्ला

ती बिझी माणसं आहेत

भावजयीची गळाभेट घेता, पण भावासोबत अबोला आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर बोलण्याची संधीच मिळाली नाही, असं उत्तर सुळेंनी दिलं. अजित पवार, देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उशिरा आले. मी तर आधीच येऊन बसले होते. पण ते उशिरा आले आणि लवकर गेले. त्यामुळे बोलण्याची संधीच मिळाली नाही, असं सुळे म्हणाल्या. मी कार्यक्रमाला आधीच आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आले. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला. दादा कार्यक्रमाला उशिरा आले. मग त्यांना विमानतळावर जायचं होतं. कदाचित त्यांची घाई गडबड असेल. त्यांना विमानतळाच्या टर्मिनलच्या उद्घाटनाला जायचं होतं. त्यामुळे घाई असू शकते. ते बिझी लोक आहेत, असं सुळे यांनी म्हटलं.

- Advertisement -

महायुतीमधील तीनही पक्षांना सन्मानजनक जागावाटप

शरद पवार गटाने बारामतीचा उमेदवार जाहीर केला, याबद्दल अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, स्वागत आहे. लोकशाहीत सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करू शकतात. महायुतीचा जागावाटपाचा निर्णय झाला की, आम्हीही आमचे उमेदवार जाहीर करू. यावर तुम्हाला हव्या तेवढ्याच जागा मिळणार की कमी मिळणार? असा प्रश्न माध्यमांनी विचारताच अजित पवार चिडले. तुम्ही आम्हाला वेडे समजलात का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. महायुतीमधील तीनही पक्षांना सन्मानजनक जागावाटप होईल, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

हेही वाचा – Ramdas Kadam : भाजपाने विरोध केल्याने शिंदेंनी भास्कर जाधवांना घेणे टाळले, रामदास कदमांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -