घरठाणेफेरीवाला धोरण आले दृष्टीपथात

फेरीवाला धोरण आले दृष्टीपथात

Subscribe

१३६७ फेरीवाले झाले अंतिम

ठाणे  : मागील कित्येक वर्षे रखडलेले फेरीवाला धोरण आता ख:या अर्थाने दृष्टीपथात येतांना दिसत आहे. त्यानुसार आता १३६७ फेरीवाल्यांची यादी जवळ जवळ अंतिम झाली असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली. पालिकेने फेरीवाला धोरण अंतिम करण्यासाठी हरकती सुचना मागविल्या होत्या. त्यानुसार ३८ हरकती सुचना प्राप्त झाल्या होत्या. त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता फेरीवाला धोरण हे अंतिम होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु हे धोरण अंतिम झाल्यानंतर उर्वरीत फेरीवाल्यांना व्यावसाय करता येणार की नाही? याबाबत मात्र अद्याप निश्चिती झालेली नाही.

फेरीवाला धोरणामध्ये फेरीवाल्यांना जागा निश्चित करून त्याच ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यांनी बसने अपेक्षित असताना ठाण्यात आज गर्दीच्या ठिकाणी मग ते स्टेशन असो, हॉस्पिटल असो किंवा शाळा असो अशा अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी अनाधिकृतपणो आपले बस्तान मांडले आहे. हे फेरीवाले केवळ ठाणो शहरातीलच नव्हे तर ठाण्याच्या बाहेरील कुर्ला, भिवंडी, असे बाहेरचे फेरीवाले येऊनही या ठिकाणी प्रशासनाच्या नाकावर टिचून आपला व्यवसाय करत आहेत.२०१९ मध्ये ठाणे महापालिकेने जो सर्व्हे केला त्या सर्व्हेच्या आधारे ठाणे शहरात केवळ ६ हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये केवळ २ हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान आता फेरीवाला धोरण अंतिम करीत असतांना हा आकडा १२३० च्या घरात आला आहे. या फेरीवाल्यांची पहिली यादी पालिकेने जाहीर केली आहे. या यादीत नावात किंवा इतर काही बदल असतील तर ते १२ ऑगस्ट र्पयत करुन घेण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यानुसार आतार्पयत पालिकेच्या ९ प्रभाग समिती अंतर्गत ३८ हरकती सुचना प्राप्त झाल्या असून त्या निकाली काढण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेने शहरातील ६ हजार ३६२ फेरीवाल्यांचा सर्व्हे केला होता. त्यातील १२३४ फेरीवाले अंतिम करण्यात आले आहेत. परंतु सर्व्हे सुरु असल्याने त्यात वाढ होऊन ही संख्या आता १३६७ एवढी झाली आहे.
दरम्यान ज्या सुचना हरकती आल्या होत्या. त्या कोणत्या स्वरुपाच्या होत्या. त्या कशा स्विकारल्या गेल्या याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर ही यादी अंतिम होणार आहे. त्यानंतर फेरीवाल्यांच्या कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. त्यातून फेरीवाला समितीची स्थापना केली जाणार आहे. यासाठी निवडणुक घेतली जाणार असून त्यानंतर फेरीवाला धोरण हे अंतिम केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -