घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टीकणार नाही

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टीकणार नाही

Subscribe

प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर शिवसेना-एनसीपी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभाग स्वीकारला. अशावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाकीत वर्तविले आहे. शिवसेना-एनसीपी आणि काँग्रेसचे सरकार सिद्धांतांच्या विरोधात असून हे सरकार जास्त दिवस टीकणार नाही असा दावा गडकरी यांनी केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप बहुमतामध्ये आले आहेत. जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात मतदान केले आहे. शिवसेनेने ज्यांच्या विरोधात मत मागितले त्यांच्याशीच हात मिळवणी करुन जनतेचा विश्वासघात केला. यामुळे शिवसेनेचे समर्थक देखील नाराज आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा ताळमेळ एनसीपी-काँग्रेसशी बसणार नाही आणि काँग्रेस-एनसीपीच्या विचारांचा ताळमेळ शिवसेनेशी बसत नाही त्यामुळे ही आघाडी फार काळ टीकणार नसल्याचे गडकरी म्हणाले.

- Advertisement -

२०१८ मध्ये साधारण ७५ टक्के भागावर भाजपचा झेंडा होता पण आता एका वर्षांतच हा प्रवास ४० टक्क्यांवर आला असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना प्रत्येक निवडणूक ही आमच्यासाठी आव्हान असते. प्रत्येक निवडणूक ही आमच्यासाठी महत्वाची असते. उतार-चढाव हे पक्षामध्ये येत असतात. राजकारणात काहीच शाश्वत नसते, अशा गतीनेच काम होणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.

जर भाजप आणि एनसीपीचे सरकार बनले असते तर ते ५ वर्षे टीकले असते का या प्रश्नावर जरतरच्या चर्चांना राजकारणात स्थान नसते. एनसीपी आणि भाजपच्या युतीची अधिकृत चर्चा झाली नाही, असे गडकरी म्हणाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत काही आमदार एनसीपी सोडू इच्छित होते. त्यावेळी त्यांची संख्या मोठी होती. पण नंतर ते आले नाहीत. राजकारणात हे होत असते असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -