घरमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये रेल्वेखाली उडी मारुन तिघांची आत्महत्या

अहमदनगरमध्ये रेल्वेखाली उडी मारुन तिघांची आत्महत्या

Subscribe

तीन जणांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्ये केल्यामुळे अहमदनगर हादरले आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी राहुरी दरम्यान रेल्वेखाली उडी मारुन तीन जणांनी आत्महत्या केली. दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर वांबोरी रेल्वेस्थानकानजीक रेल्वेखाली तिघांनी आत्महत्या केली. अजनी – पुणे या रेल्वेखाली दोन महिला आणि एक मुलगा यांनी उडी मारुन आत्महत्या केली. आई आणि मुलाची ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. मात्र, ५२ वर्षांच्या महिलेची ओळख अजून पटू शकलेली नाही. आत्महत्येचे कारणही समजू शकले नाही. याप्रकरणी अहमदनगर रेल्वे पोलीस यांच्याकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


हेही वाचा – पत्नीच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून पतीची मुलांसहित आत्महत्या

- Advertisement -

अजनी- पुणे एक्सप्रेस रेल्वे राहुरीवरून अहमदनगरच्या दिशेने जात असताना खडांबे शिवारात तिघांनी रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली. वर्षा अंबादास ठुबे ४३ आणि मुलगा अनुप बिरजाशंकर तिवारी ९ वर्ष राहणार केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर आणि एक अनोळखी महिला वय ५० वर्ष या तिघांनी एकत्रित आत्महत्या केली. या प्रकरणी अजनी -पुणे एक्सप्रेस चालक यांनी तात्काळ वांबोरी रेल्वे स्टेशनला या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ अहमदनगर रेल्वे पोलिसांना या घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तिघांचे मृतदेह अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -