घरठाणेठाण्यात ५०० भटक्या श्वानांचे लसीकरण, मनसे आणि पॉज संस्थेचा अनोखा उपक्रम

ठाण्यात ५०० भटक्या श्वानांचे लसीकरण, मनसे आणि पॉज संस्थेचा अनोखा उपक्रम

Subscribe

ठाणे शहरातील भटक्या श्वानांची दहशत वाढत असून जिल्ह्यात सुमारे ३.५ वर्षात एक लाख लोकांना श्र्वानांनी चावा घेतला आहे. पालिका स्तरावर होणाऱ्या लसीकरणाबाबत उदासिनता दिसून येत असून ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे स्वप्निल महिंद्रकर व पॉज या संस्थेच्या वतीने ठाणे शहरात ५०० भटक्या श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून या श्वानांचे अपघात टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडियम बेल्ट घालण्यात आले.

ठाणे शहरातील माजीवडा, कोपरी, नौपाडा, पोखरण २, लोकमान्य नगर या परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून. या परिसरातील अनेकांना श्र्वानांनी चावा घेतला असून शहरात गेल्या तीन वर्षात साडेचार हजार नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने भटक्या श्वानांना रेबीज लसीकरण केले जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने दरवर्षी भटक्या श्वानांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जाते, त्यामुळे त्या परिसरात श्वान दंशाचे प्रमाणही कमी आढळून येते.

- Advertisement -

ठाण्यात श्वान दंश होण्याचे कारण ठाणे पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष. इतर पालिकेच्या वतीनेही अशा भटक्या श्वांनाना लसीकरण केले जात नसल्यामुळे त्यांच्यामध्ये रेबीजचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे भटके श्वान पिसाळून परिसरातील नागरिकांना चावा घेण्याच्या घटनाही वाढत आहेत.

भटक्या श्वानांचा बंदोबस्त व निर्बिजीकरणाचा कायदा आहे. याबाबत कायद्यामध्ये मोकाट, भटक्या आणि पिसाळलेल्या श्वानांचा कसा बंदोबस्त करावा याचे निर्देशही देण्यात आलेले आहे. मात्र पशु वैद्यकीय विभाग याबाबत कासवगतीने कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पशुवैद्यकीय विभाग या भटक्या श्वानांबाबत कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे काही सामाजिक संस्थांच्या वतीने भटक्या श्वानांना लसीकरण केले जात आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांबरोबरच पाळीव श्वानांचा प्रश्नही गंभीर होत चालला असून लिफ्टमधून घेऊन जाणाऱ्या श्वानांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. ठाणे शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पॉज या संस्थेच्या वतीने ५०० भटक्या श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून त्यांच्या गळ्यात रेडियम बेल्ट घालण्यात आला.

दिवसाला ७० ते ८० श्वानांवर नसबंदी व लसीकरण आवश्यक

महापालिका आणि ग्रामपंचायत परिसरातही भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी आणि अॅन्टी रेबीज लसीकरण करणे आवश्यक आहे. ही मोहिम सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण आजही पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रात केवळ ४ ते ५ श्वानांवर नसबंदी केली जाते. प्रत्यक्षात दिवसाला ७० ते ८० श्वानांवर होणे आवश्यक आहे. तसेच अनेक वेळा पालिकेचे टेंडरची मुदत संपली की हे केंद्र काही काळ बंद राहते. त्यामुळे दिवसेंदिवस भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने भटक्या श्वानांच्या लसीकरणाच्या प्रती जागरूकता दाखवली पाहिजे, जेणेकरून त्या श्वानांमध्ये रेबीज आजाराचे प्रमाण कमी करण्यात मदत होईल. ठाण्यातील भटक्या श्वानांची दहशत कमी करण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग अधिक सज्ज होण्याची गरज आहे.
– स्वप्निल महिंद्रकर, ठाणे शहराध्यक्ष जनहित व विधी विभाग मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -