Vinod Tawade explained |मुंबई – माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे (Former Education Minister Vinod Tawade) अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढणार होते, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी केला होता. यावरून भाजपा नेते विनोद तावडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी आज एक व्हिडीओ प्रसारित करत मुघलांचा इतिहास काढणं म्हणजे शिवाजी महाराजांचं शौर्य काढण्यासारखं नाही असं ते म्हणाले.
हेही वाचा – …तर रावण काढून रामायण समजावून सांगा, जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम!
विनोद तावडे म्हणाले की, “मी मुघलांचा इतिहास काढणार होतो असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास काढणार नाही. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे याचा अर्थ अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही हे शिकवणं बंद करणार. मुघलांच्या काळात स्थापत्यशासन खूप चांगलं होतं, त्यांनी कलेला आश्रय दिलं, असं नाही. आधीच्या काळातही असं होतं. अकबर दि ग्रेट ज्याने लाखो हिंदूंची कत्तल केली. ते शिकवणं काढणार. शिवाजी महाराज कुशल प्रशासक होते हे सांगितलं, त्यांचं शौर्य काय आहे हेही सांगितलं.”
“मला जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक कळत नाही की शाहिस्तेखान शिकवला म्हणजे शिवाजी महाराजाचं शौर्य कळतं. त्यांना असं म्हणायचं आहे का कसाब आला म्हणून करकरे, कामटेआणि ओमाळेंचं शौर्य दिसलं? ते आधीपासूनच शूर होते, त्यासाठी कसाबला येण्याची गरज नव्हती. तरीसुद्धा मला म्हणायचं की मुघलांचा इतिहास म्हणजे कुतुबाशाही, आदिलशाही शिकवणं बंद झाली पाहिजे,” असंही त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं.
मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही. @Awhadspeaks pic.twitter.com/AZJjWG0TdY
— Vinod Tawde (@TawdeVinod) February 6, 2023
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?
एमपीएससीच्या परीक्षेतून महाराष्ट्राच्या इतिहासाचा विषयच काढून टाकला. विनोद तावडेंनी जाहीर केलं होतं की मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा.
बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा#आवाज_बहुजनांचा_सन्मान_महाराष्ट्राचा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2023
हेही वाचा – “मुघलांचा पुळका असेल तर चालते व्हा पाकिस्तानला…” निलेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका