घरमहाराष्ट्रअरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र; पुण्यासह 10 जिल्ह्यात जोरदार पावसाचा...

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र; पुण्यासह 10 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

Subscribe

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर अधिक असणार आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुढील चोवीस तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून सुदैवाची बाब म्हणजे अरबी समुद्रात निर्माण झालेलs कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्राला धोका नाही. पण आज आणि उद्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने आज पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लांबचा प्रवास टाळण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

शनिवारी सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून मागील चोवीस तासांत मुंबईत 10 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी राज्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनाच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारनंतर राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -