घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती ही गेल्या निवडणुकीतच होती. शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार माजी उर्जा मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसंच शिवसेनेने महाराष्ट्राचं वाटोळं केलं, असा घणाघात देखील बावनकुळे यांनी केला. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

विधानसभा निवडणूक शिवसेनेने आमच्यासोबत युती करुन लढवली. केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करुन घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत छुपी युती केली होती, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपने केला आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

- Advertisement -

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे पक्ष असून त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांनी कोणासोबत युती करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण शिवसेनेने विधानसभेच्या सहा महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीसोबत युती केली होती. डणवीसांचा प्रभाव वापरून अधिकाधिक जागा निवडून आणा आणि पळून या. मातोश्रीचे दरवाजे भाजपला बंद करा, असं आधीच ठरलं होतं, असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आता आगामी निवडणूकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र लढली तरीही काहीही परिणाम नाही. आम्ही निवडणुकीच्या राजकारणातून शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही, असं सांगतानाच आगामी सर्व निवडणुका जिंकण्याचा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -