घरमुंबईभिवंडीत नाकाबंदी दरम्यान १२ लाख जप्त

भिवंडीत नाकाबंदी दरम्यान १२ लाख जप्त

Subscribe

नाकाबंदी दरम्यान दोन वेगवेगळ्या कारवाईत २४ तासात १२ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपिंविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी भिवंडी लोकसभा क्षेत्रात सुरु आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तपासणी नाके स्थापन करुन वाहनांची तपासणी सुरु आहे. अशाच प्रकारच्या तपासणी दरम्यान दोन वेगवेगळ्या कारवाईत चोवीस तासात १२ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत साडेसोळा लाखापेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे.

अशी केली कारवाई

भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात कारीवली नाका या ठिकाणी आचारसंहिता पथकाकडून वाहन तपासणी सुरु होती. यावेळी एका कारमधील एका सुटकेसमध्ये तब्बल १० लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. सदरची कार मारु एंटरप्रायझेसचे हितेश मारु या कपडा उत्पादकांची असून त्यानी दैनंदिन व्यवहारासाठी सदरची रक्कम बाळगल्याचे सांगितले. परंतु, त्यासंदर्भात सदरची रक्कम कोठून आणली याचे समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने आचारसंहिता पथक प्रमुख अतिरिक्त गटविकासाधिकारी अविनाश मोहीते व जयवंत माने यांनी सदरची रक्कम जप्त केली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेची माहिती कळताच कल्याण येथील आयकर विभागाच्या पथकाने सुध्दा भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत या राक्केमेची चौकशी सुरु केली आहे.

- Advertisement -

दुसऱ्या कारमध्ये सापडले २ लाख

तर, रात्री भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात साईबाबा नाका या ठिकाणी रात्रीच्या वेळी आचारसंहिता पथकाकडून शहरात येणा-या वाहनांची तपासणी सुरु होती. त्यावेळी एका कारची तपासणी केली असता कारमध्ये असलेल्या सुटकेसमध्ये २ लाख १४ हजार ६०० ऐवढी रक्कम आढलली. कार मालक शांतीलाल जैन यांच्याकडे रोख रक्कम बाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने सदरची रक्कम आचारसंहिता पथकाने जप्त केली. आचारसंहिता पथकाचे अधिकारी सुभाष झळके, सुनील भोईर यांनी ही करवाई केली असून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -