पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसर पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. काल, बुधवारी मध्यरात्री एकामागून एक जोरदार भूकंपाचे धक्के या परिसरात बसले. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार ४.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद पालघरमध्ये करण्यात आली आहे. डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाडपर्यंत या भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने या परिसरातील नागरिक भीतीने घराबाहेर पडले.
An earthquake with a magnitude of 3.6 on the Richter Scale hit Palghar of Maharashtra at 1:15 AM today.
— ANI (@ANI) July 25, 2019
भूकंपाचे लागोपाठ सात धक्के
काही वेळाच्या अंतराने सात धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री ९.४९ वाजता २.४ रिश्टर स्केल, १२.३३ वाजता २.२ रिश्टर स्केल, १२.३६ वाजता १.९ रिश्टर स्केल, १.०३ वाजता ४.८ रिश्टर स्केल, १.१२ वाजता २.९ रिश्टर स्केल, १.१५ वाजता ३.६ रिस्टर स्केल, १.१८ वाजता २.८ रिस्टर स्केल असे एकूण एक तासात सात भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे.
Maharashtra: A 55-year-old man died in Dahanu area of Palghar district after wall of a house collapsed on him, in the earthquake last night. https://t.co/HoPZC7sV1z
— ANI (@ANI) July 25, 2019
दरम्यान, डहाणू येथील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू काल झालेल्या भूकंपामुळे झाला असल्याची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्याला बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यामुळे डहाणूत या महिलेच्या घराचे छत कोसळले असून त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रिष्या मेघवाले असे या महिलेचे नाव आहे.