माहुलमधील नागरिकांना राहण्यायोग्य घर द्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे माहुलवासीयांना अन्यत्र स्थलांतरित करण्यासंदर्भात विधानसभेत चर्चेची आवश्यकता नाही. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा हल्लाबोल माजी मंत्री नसीम खान यांनी सरकारवर केला. काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी रविवारी माहुलवासीयांची आंदोलनस्थळी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. कुर्ला येथे एचडीआयएलने बांधलेल्या संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतरित करण्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी माहुलवासीयांना दिले होते. त्यासाठी चार दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, आठवडा उलटला तरी यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यापार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणार्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी रविवारी माहुलवासीयांची भेट घेतली.
माहुलप्रकरणी चर्चा नको निर्णय घ्या!
written By My Mahanagar Team
Mumbai
माजी मंत्री नसीम खान यांचा सरकारवर हल्लाबोल
मागील लेख
पुढील लेख
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -