मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यासंदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करून सर्वेक्षणाला सुरवात करावी असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास दिले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत आव्हाड बोलत होते. कामाठीपुरा येथीलसुमारे ४० एकर जमिनीवर वसलेल्या एक हजार इमारतींपैकी७०० इमारती आणि चाळी १०० वर्षे जुन्या असून अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत.किमान ५० ते १८० चौ. फुटाच्या छोट्याशा खोलीत येथील रहिवाशी धोकादायक अवस्थेत राहत असल्याने हा पुनर्विकास एक आव्हानात्मक बाब ठरणार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने सैफी-बुर्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्ट (एसबीयूटी) च्या धर्तीवर कामाठीपुरा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आव्हाड यांनी दिले.
या बैठकीत सन १९६९ नंतरच्या उपकरप्राप्त इमारतींसंदर्भात धोरण ठरविण्याच्या अनुषंगाने विकासकांबरोबर झालेल्या चर्चेत उपकरप्राप्त इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी मुंबईतील उपकरप्राप्त जमिनींचे मालक, भाडेकरू-रहिवाशी यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. तसेच उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासानंतर म्हाडास प्राप्त होणार्या अतिरिक्त क्षेत्राच्या वितरणाबाबत निश्चित धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. वास्तुशास्त्रज्ञांबरोबर झालेल्या बैठकीत म्हाडाच्या मुंबईतील जुन्या वसाहतींचा समूह पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात यावे तसेच पुनर्विकास करताना पुनर्विकसित इमारतींमध्ये मूळ रहिवाशांना देण्यात येणार्या पुनर्विकसीत सदनिकांचेआकारमान निश्चित करण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश देखील याप्रसंगी आव्हाड यांनी दिले.
गृहनिर्मितीच्या कामाला वेग
राज्यातील घरांची वाढतीमागणी आणि पुरवठा यातील वाढती तफावत लक्षात घेता गृहनिर्मितीच्या कामाला वेग देणे महत्वाचे असल्याचे सांगत आव्हाड म्हणाले की, राज्यात प्रधान मंत्री आवास योजनेची अंमलबजावणी सक्षमतेनेहोणे गरजेचे आहे. करिताम्हाडाच्या अखत्यारीत राज्यात उपलब्ध असलेल्या जमिनींचासंपूर्ण माहिती अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.तसेच नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या महत्वाच्या शहरांलगत हरित पट्टयामधील आणि ना-विकसित क्षेत्रातील शासकीय भूखंडांची माहिती घ्यावीव हे भूखंड म्हाडाला परवडणार्या दरातील गृहप्रकल्प राबविण्याकरितादेण्यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही आव्हाड यांनी दिले.
महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी छोट्या आकारमानाची अंदाजे ३०० ते ४०० चौ. फुटाच्या अत्यंत परवडणार्या दरातील सदनिका नागरिकांना बांधून देण्याचा शासनाचा मानस आहे. या सदनिका प्री-फॅब तंत्रज्ञानावर बांधल्यास परवडणार्या दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येऊ शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. याकरिता बांधकाम क्षेत्रातीलनाविन्यपूर्ण तंत्रज्ञाचा उपयोग करून स्वस्त दरातील गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याकरिता जागतिक स्तरावर निविदा मागवाव्यात, अशी सूचना याप्रसंगी संबंधित अधिकार्यांना केली.
म्हाडाच्या भाडेकरूंसाठीही बायोमेट्रिक सर्वेक्षण
म्हाडाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरातील भाडेकरूंची “अ”, “ब” व ” क” वर्गातीलपात्रता निश्चिती करिता बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यातयावे, असे निर्देश आव्हाड यांनी संबंधित अधिकार्यांना सांगितले . पथदर्शी प्रकल्प तत्वावरसर्वात प्रथमसायन येथील प्रतीक्षा नगर संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश आव्हाड यांनी दिले.