घरमुंबईLok Sabha Election 2024 : राज्यातील 48 जागा जिंकण्याचा निर्धार; दिनेश शर्मांकडून...

Lok Sabha Election 2024 : राज्यातील 48 जागा जिंकण्याचा निर्धार; दिनेश शर्मांकडून विश्वास व्यक्त

Subscribe

मुंबई : राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाची महाभेट देतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी व उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी आज व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होते. भाजपा लोकसभा निवडणूक व्यापस्थापन समितीचे अध्यक्ष आमदार श्रीकांत भारतीय, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ज्येष्ठ नेते जयप्रकाश ठाकूर, प्रवीण घुगे आदी यावेळी उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024 Determined to win 48 seats in the state Confidence expressed by Dinesh Sharma State Election In charge of BJP former Deputy Chief Minister of Uttar Pradesh bjp maharashtra politics)

हेही वाचा – Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून रामदेव बाबा यांनी स्वत: मागितली सुप्रीम कोर्टाची माफी

- Advertisement -

दिनेश शर्मा यांनी सांगितले की, यावेळची निवडणूक मोदीमय झालेली आहे. देशातच नव्हे तर जगभरातही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा बोलबाला आहे. राम मंदिर निर्मिती, 370 वे कलम रद्द करणे यासारख्या निर्णयांमुळे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व झळाळून उठले आहे. केंद्र सरकार आणि भाजपाशासित राज्यांच्या सुशासनामुळे जनतेचा भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरील विश्वास वाढला आहे. महाराष्ट्रातही नरेंद्र-देवेंद्र या जोडीच्या जादूमुळे मतदार महायुतीला मोठा विजय मिळवून देतील, असे वातावरण आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना दिशे शर्मा म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला नेहमीच प्रखर विरोध केला. हिंदुत्वाचे कडवे समर्थक असलेल्या बाळासाहेबांना काँग्रेसचे हिंदुविरोधी रूप माहित होते. उद्धव ठाकरे यांनी मात्र मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करत मतदारांचा विश्वासघात केला. या विश्वासघाताला मतदार या निवडणुकीत योग्य उत्तर देतील. मतदारांच्या मध्ये महाविकास आघाडीबद्दल असलेल्या संतापामुळे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या महाविकास आघाडीचा निवडणुकीत धुव्वा उडेल.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपाने ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी; संजय राऊतांचे आव्हान

वंचित जनता उद्धव ठाकरेंसह काँग्रेसला धडा शिकवणार

हिंदुविरोधी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत कसे पराभूत केले हा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे. अशा आंबेडकर विरोधी मंडळींशी उद्धव ठाकरे यांनी आघाडी करावी ही गोष्ट राज्यातील शोषित, वंचित जनतेला आवडली नाही. ही जनता उद्धव ठाकरे, काँग्रेसला निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही दिनेश शर्मा यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -