मुंबईत गेल्या २४ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले. दरम्यान, वरळीतील बीडीडी चाळीत लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून त्यांच्या सर्व वस्तू पाण्यात गेल्या आहेत. वरळीची हीच परिस्थिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहे. संदीप देशपांडे यांनी वरळीतील एका घरात शिरलेल्या पावसामुळे रहिवाशाचे कसे नुकसान झाले आहे, ते दाखवले आहे. सोबतच त्यांनी या मतदार संघातील आमदार आदित्य ठाकरे यांना टोला लगावणारी पोस्ट शेअर केली आहे. देशपांडे यांनी ‘केम छो वरळी’, असे उपरोधात्मक वक्तव्य त्यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेने नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीमध्ये ‘केम छो वरळी’ हा फलक लावून प्रचार केला होता. त्यावर संदीप देशपांडे यांनी आमदारांना टोला लगावला आहे.
केम छो वरळी pic.twitter.com/pWiGcgwPU1
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 23, 2020
मंगळवारी रात्रीपासूनच मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईत पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचे (Waterlogging in Mumbai) चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागातली वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. सकाळीच ऐन कामावर जायच्या गडबडीत पावसानं मुंबईकरांची दैना उडवून दिली. वेधशाळेनं मुंबईत पुढच्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा –
कंगना, गुप्तेश्वर पांडे हे फार मोठं षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप!