घरमुंबईमहाराष्ट्रात वर्षात 726 खड्डेबळी तर देशात रोज 10 मृत्यू

महाराष्ट्रात वर्षात 726 खड्डेबळी तर देशात रोज 10 मृत्यू

Subscribe

मुंबईसह, महाराष्ट्र आणि देशभरात रस्त्यांवरील खड्डे ही मोठी समस्या बनली आहे. वर्षानुवर्षे ही समस्या जैसे थे स्वरूपात आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे या खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढतच आहे.

मुंबईसह, महाराष्ट्र आणि देशभरात रस्त्यांवरील खड्डे ही मोठी समस्या बनली आहे. वर्षानुवर्षे ही समस्या जैसे थे स्वरूपात आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे या खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढतच आहे. ही समस्या इतकी गंभीर बनली आहे की, खड्ड्यांमुळे मृतांच्या संख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी 2017 साली देशात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तीन हजार 597 जणांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी महाराष्ट्रातील 726 जणांचा समावेश आहे. २०१८ सालीही मोठ्या संख्येने मृत्यूंची नोंद झाली आहे. 2016 सालच्या तुलनेत मागील वर्षी २०१७ मध्ये खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांच्या संख्येते तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2017 मध्ये मृतांची संख्या ३ हजार 597 होती. म्हणजेच सरासरी महाराष्ट्रातही 2016 सालच्या तुलनेत खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या दुपटीवर पोहचली आहे.

- Advertisement -

राज्यात 2017 साली 726 जण मृत्युमुखी पडले. ही आकडेवारी पाहिल्यावर राज्य सरकार रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत किती हलगर्जीपणा करत आहे, हे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशात खड्ड्यांमुळे सर्वाधिक 987 बळी गेले आहेत.दिल्ली आणि हरियाणामध्ये 2016 साली एकही खड्डेबळी नव्हता, मात्र गेल्या वर्षी हरियाणात तब्बल 522 जणांनी प्राण गमावले, तर दिल्लीत आठ बळी गेले. रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घालणे ही कारणेही खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांचा मृत्यूदर वाढवतात, असे म्हटले जात आहे. रस्ते दुरुस्ती सुरू असलेल्या ठिकाणाजवळ झालेल्या अपघातात गेल्या वर्षी चार हजार 250 जण मृत्युमुखी पडले.

नक्षली हल्ल्यात प्राण गमावलेल्यांपेक्षा अधिक खड्डेबळी

देशभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत झालेल्यांची संख्या ही विशेष म्हणजे देशभरात नक्षली हल्ल्यात प्राण गमावलेल्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी नक्षली हल्ल्यात 803 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुरक्षा दल अधिकारी आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -