सशस्त्र सीमा दलाकडून हवालदार पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पोलीस भरती आणि सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सशस्त्र सीमा दलात नोकरी करण्याची उत्तम संधी या मोठ्या भरतीमुळे मिळणार आहे. राज्य सरकारने डिसेंबरपर्यंत राज्यात तब्बल १२ हजार जागांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, उमेदवारांची तयारी सुरू आहे.
अशी आहे वयाची अट
राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून उमेदवारांना ही चांगली संधी आहे. दरम्यान, सशस्त्र सीमा दलाानेही १ हजार ५२२ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. वय वर्षे १८ ते २७ पर्यंत असणाऱ्या उमेदवारांना या जागांकरता अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा केंद्र सरकारच्या गृह खात्यांतर्गत असलेल्या सरकारी नोकरीत समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. या उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये प्रतिमाह वेतन मिळणार आहे.
१० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख
निवड झालेल्या उमेदवारांना देशात कुठेही नोकरीसाठी पाठविण्यात येईल. दलाकडून निघालेल्या १ हजार ५२२ जागांमध्ये आर्थिक मागास आणि मागास प्रवर्गासाठी १०० रुपये परीक्षा फी असणार आहे. तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निवृत्त सैन्य दलातील वारसांना व महिलांना मोफत अर्ज करता येईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांनी १० सप्टेंबरपर्यंत आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे करता येणार आहे.
अर्ज करण्याकरता आणि अधिक माहितीसाठी https://ssb.nic.in/ यावर क्लिक करा.